२५ लाखाच्या अमिषाने कर्जबाजारी झाल्याने केला मित्र ‘इंद्रदेव’चा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 11:59 IST2019-12-28T11:59:47+5:302019-12-28T11:59:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय महामार्गा क्रमांक सहावर मोरकारंजा ता़ नवापुर शिवारात ट्रकचालकाच्या खूनाचा गुन्हा एलसीबीच्या पथकाने उघडकीस ...

२५ लाखाच्या अमिषाने कर्जबाजारी झाल्याने केला मित्र ‘इंद्रदेव’चा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्ट्रीय महामार्गा क्रमांक सहावर मोरकारंजा ता़ नवापुर शिवारात ट्रकचालकाच्या खूनाचा गुन्हा एलसीबीच्या पथकाने उघडकीस आणला आहे़ याप्रकरणी पोलीसांनी अवघ्या ४८ तासात तिघांना मुंबईतून ताब्यात घेतले असून २५ लाखाच्या अमिषात कर्जबाजारी झाल्याने ट्रकचालक मित्राचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे़
मोरकरंजा गावाजवळ नाल्यात अज्ञात इसमाचे प्रेत आढळुन आले होते़ हा मृतदेह सुरत येथील इंद्रदेव ओमप्रकाश यादव याचा असल्याचे निष्पन्न झाले होते़ याप्रकरणी ट्रान्सपोर्ट मालक सुनिल गिरधारीलाल गुप्ता यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ जालना येथून परतणाऱ्या इंद्रदेव यादव गावाकडील मित्राने खून केला असावा असा अंदाज होता़ याप्रकरणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी पथक तयार करुन शोध सुरु केला होता़ यातून मुंबई येथील पथकाच्या हातील प्रमुख आरोपी मानसिंग बैजनाथ वर्मा हा लागला होता़ त्याने संजय रामशंकर वर्मा व विजय भगीरथी वर्मा यांच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली होती़ यानुसार दोघांना अनुक्रम माहिम आणि भिवंडी येथून अटक करण्यात आली होती़
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधिक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, एलसीबीचे पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र नगराळे, प्रमोद नाईक, प्रमोद सोनवणे, राकेश वसावे, शांतीलाल पाटील, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली़
४ मुख्य आरोपी मानसिंग वर्मा यास २५ लाखांची लॉटरी लागल्याचा काही दिवसांपूर्वी फोन आला होता़ समोरुन बोलणाºया व्यक्तीने २५ लाख घेण्यासाठी टॅक्स स्वरुपात पैसे भरावे लागतील असे सांगितल्यानंतर त्याने वेळोवेळी साडेचार लाख रुपये भरले होते़ पैसे भरुनही पैसे मिळत नसल्याने त्याने बँकेत चौकशी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे समोर आले होते़ कर्जबाजारी झालेल्या मानसिंग याने जालना येथून येणाºया इंद्रदेव याच्यासोबत संपर्क करुन त्याला रस्त्यात गाठले होते़ ट्रकमधील सळई विकून कर्ज फेडण्याचा त्याचा उद्देश होता परंतू इंद्रदेव याने नकार दिल्याने त्याने त्याचा खून केला होता़