शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : राज्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच या पदाधिका:यांच्या मानधनात शासनाने भरीव वाढ केली असून, या वाढीव ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : राज्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच या पदाधिका:यांच्या मानधनात शासनाने भरीव वाढ केली असून, या वाढीव मानधनाचा लाभ नंदुरबार जिल्ह्यातील 594 सरपंचांना होणार आहे. शासनाच्या धोरणात्मक निर्णयाचे या पदाधिका:यांनी समाधान व्यक्त केले असले तरी हे मानधन नियमित मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.राज्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच या पदाधिका:यांना राज्यशासनाकडून दरमहा मानधन दिले जात असते. परंतु हे मानधन पंचायतींची कामे व खर्चाच्या तुलनेत अतिशय कमी होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्या वेगवेगळ्या संघटनांमार्फत मानधनात भरीव वाढ करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत होती. यासाठी संघटनांनी आंदोलनेही केली होती. याशिवाय सद्या महागाईदेखील मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. यासर्व पाश्र्वभूमिवर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने या पदाधिका:यांच्या मानधनात भरीव अशी वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणीदेखील या महिन्यापासूनच करण्यात येणार असून, तसे आदेशही तालुकास्तरावरील पंचायत समितींच्या गटविकास अधिका:यांना दिले आहे.पदाधिका:यांना देण्यात येणारे मानधन संबंधीत ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात देण्यात येणार आहे. शासन 75 टक्के रक्कम देईल तर उर्वरित 25 टक्के रक्कम ग्रामपंचायतीने ग्रामनिधीतून द्यायची आहे. यासाठी राज्यशासनाने या वर्षाच्या अर्थसंकल्पात साधारण 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शून्य ते दोन हजार र्पयतच्या लोकसंख्येच्या सरपंचास तीन हजार, उपसरपंचास दीड हजार व आठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या पंचायतीच्या पदाधिका:यांना पाच हजार व दोन हजार याप्रमाणे देण्यात येणार आहे.नंदुरबार जिल्ह्यातील साधारण 594 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच या पदाधिका:यांना या नवीन वाढीव मानधनाचा लाभ मिळणार आहे. या पदाधिका:यांचा जिल्हा परिषदेच्या सहायक अनुदानातून खर्च करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 594 ग्रामपंचायतींपैकी 338 ग्रामपंचायतींची लोकसंख्या दोन हजारापेक्षा कमी आहे. नंदुरबार तालुक्यात 88 , शहादा 80, नवापूर  71 व तळोद्यात 43, ग्रामपंचायती आहेत. सद्या या पदाधिका:यांना तीन ते चार महिन्यानंतर त्या-त्या पंचायतींकडून मानधन दिले जात असते. त्यामुळे नियमित दरमहा मानधन देण्याची मागणी पदाधिका:यांनी केली आहे.

राज्यशासनाने ग्रामपंचायतींच्या पदाधिका:यांच्या मानधनात वाढ केली असली तरी या मानधनाच्या विगतवारीत 75 टक्के शासन तर 25 टक्यांची वाढ ग्रामपंचायतींनी द्यावी, अशी निश्चिती केली आहे. तथापि शासनाने, अशी विगतवारी न करता संपूर्ण मानधनाचे अनुदान शासनाने द्यावे, अशी अपेक्षा जिल्ह्यातील पदाधिका:यांनी केली आहे. कारण जी 25 टक्के रक्कम ग्रामपंचायतीने मानधनासाठी द्यायची आहे त्याची तरतूद ग्रामनिधीतून करायची आहे. मात्र जिल्ह्यातील बहुसंख्य पंचायतींची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत आहे. कारण त्यांच्याकडे ग्रामनिधीची वसुली पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. परिणामी या पदाधिका:यांनादेखील नियमित मानधन देण्यास आर्थिक अडचणी येतात. येथील 70 ते 80 टक्के गावकरी रोजंदारी, मजुरी करतात. त्यांच्यापुढे स्वत:चा उदर निर्वाहाचा प्रश्न असतो. ते ग्रामपंचायतींची वसुली कोणत्या आधारावर देऊ शकतील. त्यामुळे शासनाने निदान पेसा कायद्यांतर्गत येणा:या ग्रामपंचायतींना ग्रामनिधीची अट शिथिल करावी, अशी मागणी पदाधिका:यांनी केली आहे.