एकाचवेळी दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाल्याने वाहनधारकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST2021-02-06T04:58:36+5:302021-02-06T04:58:36+5:30
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदी पूल ते बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. तसेच तापी पूल ते ...

एकाचवेळी दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाल्याने वाहनधारकांची गैरसोय
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदी पूल ते बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. तसेच तापी पूल ते तळोदा चौफुली मार्गे बसस्थानकापर्यंतच्या मार्गावरील रस्त्याचे काम सुरू आहे. या वेळी दोन्ही ठेकेदारांनी एकाच वेळेला काम सुरू केल्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होत आहे. शिवाय पर्यायी रस्त्याची व्यवस्थादेखील केलेली नाही. त्यामुळे वाहतूकदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. गुुरुवारी ॲम्बुलन्सदेखील अर्धा तास यात अडकून पडली होती.
याबाबत असे की, प्रकाशा येथील तापी पुलापासून ते तळोदा चौफुली पर्यंतच्या मार्गावर कोळदा ते सेंधवा या रस्त्याचे काम सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने उशिरा का होईना काम सुरू केले. परंतु या ठिकाणी वाहनधारकांना तळोदा व शहादाकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची सोय नाही, शिवाय दररोज मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, सूचना फलकाच्या अभावामुळे रोज एक अपघात होत आहे. रस्त्यांच्या कामामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा होत असून, पर्यायी रस्त्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
तसेच तापी नदी पूल ते केदारेश्वरकडील मार्गाचे देखील रुंदीकरणाचे काम सुरू आहे. प्रकाशा ते म्हसावदपर्यंतच्या मार्गाचे काम सुरू असून, त्या अंतर्गत येथील डांबरीकरण सुरू झाले आहे. खास करून प्रकाशा बसस्थानक ते केदारेश्वरपर्यंतच्या मार्गावर रस्त्याचे काम सुरू झाले आहे. याठिकाणी पर्यायी रस्ता नसल्याने वाहतूकदारांची कोंडी होत आहे.
नंदुबारकडून प्रकाशाकडे येणारे सर्वच वाहनधारकांची गैरसोय होत असून, गुरुवारी सायंकाळी चार वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली होती. शिवाय या ठिकाणी वाहनधारकांना मार्ग दाखवण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी एकही पोलीस कर्मचारी नाही. ज्या ठेकेदारांना काम घेतले आहे. त्याचे ही माणसं या ठिकाणी नसल्याने वाहनांना दिशा दाखवणारा कोणी नसल्याने वाहने कुठेही घुसत असल्याने ट्रॅफिक जाम झाली होती. सायंकाळी येथून ॲम्बुलन्सलादेखील अर्धा तास मार्ग नव्हता, अशी वेळ दुसऱ्यांदा येऊ नये. यासाठी संबंधित ठेकेदाराने खबरदारी घेणे गरजेचे आहे. पर्यायी रस्ता काढणे अत्यावश्यक आहे. वाहनांना मार्ग दाखवण्यासाठी त्यांचे स्वतःचे मनुष्य त्याठिकाणी उभी करणे गरजेचे आहे.
दोन रस्त्याचे काम एकाच वेळी सुरू झाल्याने वाहनधारकाना अडचणी आहे. निदान दोघं ठेकेदाराने एकेरी मार्ग तरी सुस्थितीत सुरू ठेवावा जेणेकरून ट्रॅफिक नियमित जाम होणार नाही. असे त्यांचे म्हणणे आहे.
उडणारी धूळ त्रासदायक
तापी पूल ते तळोदा चौफुलीपर्यंतच्या मार्गावर गेल्या १५ ते २० दिवसांपासून काम सुरू झाले आहे. या ठिकाणी रस्त्याचे खोदकाम झाल्यामुळे माती उडत आहे. मोठे वाहन गेल्यानंतर उडणारी धूळ दुचाकीधारकांच्या डोळ्यात जात अपघाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन ठेकेदाराला समज देणे आवश्यक आहे.