शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
3
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
4
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
5
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
6
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
7
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
9
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
10
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
11
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
12
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
13
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
14
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
15
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 
16
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
६० का लगता नही कहीं से! अक्षय कुमारच्या शाहरुखला हटके शुभेच्छा; म्हणाला, "शकल से ४०..."
18
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
19
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
20
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये

काँग्रेसची सत्ता आल्यास आदिवासींना विकासात भागीदारी देऊ; राहुल गांधी यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 05:43 IST

‘भारत जोडो न्याय यात्रे’चे महाराष्ट्रात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क, नंदुरबार : या देशाचे खरे मालक आदिवासीच असून, भाजप त्यांना वनवासी संबोधून त्यांच्या न्याय्य हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, देशात काँग्रेसची सत्ता येताच आदिवासींना त्यांचा हक्क देऊन देशाच्या विकासात लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार भागीदारी मिळवून देऊ, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे दिले.

‘भारत जोडो न्याय यात्रे’चे मंगळवारी गुजरातमधून महाराष्ट्रात आगमन झाले. यावेळी राहुल गांधी यांचे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते मानाची होळी पेटविण्यात आली. तसेच ध्वज हस्तांतराचा कार्यक्रम झाला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. 

आदिवासींसाठी हे करणार...  

- वनाधिकाराचे अनेकांचे दावे या सरकारने नाकारले आहेत. त्या दाव्यांची वर्षभरात पुन्हा सुनावणी करून आदिवासींना जमिनी देऊ - वनाधिकार बिल अधिक सक्षम करून जल, जंगल, जमिनीवर आदिवासींना अधिकार देऊ. - ज्याठिकाणी आदिवासींची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे तो भाग सहाव्या शेड्युलमध्ये टाकून तेथील सर्व स्थानिक अधिकार आदिवासींना घेण्याचा अधिकार देऊ, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

आज धुळ्यात 

धुळ्यात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बुधवार १३ मार्च रोजी दुपारी १२ ते १ यावेळेत महिला न्याय हक्क परिषद होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ७:३० वाजता त्यांचा दोंडाईचात रोड शो होईल.

देशात काँग्रेसची सत्ता येताच वर्षभरातच सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणना करून समाज जीवनाचा एकप्रकारे एक्स-रे करणार आहोत. कारण, त्यातूनच खरा उपचार होणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने २२ उद्योगपतींना १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. ‘मनरेगा’चे वार्षिक बजेट ६५ हजार कोटींचे असते. हे सूत्र लक्षात घेतल्यास २४ वर्षांची ‘मनरेगा’ची रक्कम सरकारने माफ केली आहे. - राहुल गांधी, काँग्रेस नेते. 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी