शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

काँग्रेसची सत्ता आल्यास आदिवासींना विकासात भागीदारी देऊ; राहुल गांधी यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 05:43 IST

‘भारत जोडो न्याय यात्रे’चे महाराष्ट्रात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क, नंदुरबार : या देशाचे खरे मालक आदिवासीच असून, भाजप त्यांना वनवासी संबोधून त्यांच्या न्याय्य हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, देशात काँग्रेसची सत्ता येताच आदिवासींना त्यांचा हक्क देऊन देशाच्या विकासात लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार भागीदारी मिळवून देऊ, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे दिले.

‘भारत जोडो न्याय यात्रे’चे मंगळवारी गुजरातमधून महाराष्ट्रात आगमन झाले. यावेळी राहुल गांधी यांचे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते मानाची होळी पेटविण्यात आली. तसेच ध्वज हस्तांतराचा कार्यक्रम झाला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. 

आदिवासींसाठी हे करणार...  

- वनाधिकाराचे अनेकांचे दावे या सरकारने नाकारले आहेत. त्या दाव्यांची वर्षभरात पुन्हा सुनावणी करून आदिवासींना जमिनी देऊ - वनाधिकार बिल अधिक सक्षम करून जल, जंगल, जमिनीवर आदिवासींना अधिकार देऊ. - ज्याठिकाणी आदिवासींची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे तो भाग सहाव्या शेड्युलमध्ये टाकून तेथील सर्व स्थानिक अधिकार आदिवासींना घेण्याचा अधिकार देऊ, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

आज धुळ्यात 

धुळ्यात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बुधवार १३ मार्च रोजी दुपारी १२ ते १ यावेळेत महिला न्याय हक्क परिषद होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ७:३० वाजता त्यांचा दोंडाईचात रोड शो होईल.

देशात काँग्रेसची सत्ता येताच वर्षभरातच सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणना करून समाज जीवनाचा एकप्रकारे एक्स-रे करणार आहोत. कारण, त्यातूनच खरा उपचार होणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने २२ उद्योगपतींना १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. ‘मनरेगा’चे वार्षिक बजेट ६५ हजार कोटींचे असते. हे सूत्र लक्षात घेतल्यास २४ वर्षांची ‘मनरेगा’ची रक्कम सरकारने माफ केली आहे. - राहुल गांधी, काँग्रेस नेते. 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी