शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

काँग्रेसची सत्ता आल्यास आदिवासींना विकासात भागीदारी देऊ; राहुल गांधी यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 05:43 IST

‘भारत जोडो न्याय यात्रे’चे महाराष्ट्रात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क, नंदुरबार : या देशाचे खरे मालक आदिवासीच असून, भाजप त्यांना वनवासी संबोधून त्यांच्या न्याय्य हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, देशात काँग्रेसची सत्ता येताच आदिवासींना त्यांचा हक्क देऊन देशाच्या विकासात लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार भागीदारी मिळवून देऊ, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे दिले.

‘भारत जोडो न्याय यात्रे’चे मंगळवारी गुजरातमधून महाराष्ट्रात आगमन झाले. यावेळी राहुल गांधी यांचे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते मानाची होळी पेटविण्यात आली. तसेच ध्वज हस्तांतराचा कार्यक्रम झाला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. 

आदिवासींसाठी हे करणार...  

- वनाधिकाराचे अनेकांचे दावे या सरकारने नाकारले आहेत. त्या दाव्यांची वर्षभरात पुन्हा सुनावणी करून आदिवासींना जमिनी देऊ - वनाधिकार बिल अधिक सक्षम करून जल, जंगल, जमिनीवर आदिवासींना अधिकार देऊ. - ज्याठिकाणी आदिवासींची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे तो भाग सहाव्या शेड्युलमध्ये टाकून तेथील सर्व स्थानिक अधिकार आदिवासींना घेण्याचा अधिकार देऊ, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

आज धुळ्यात 

धुळ्यात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बुधवार १३ मार्च रोजी दुपारी १२ ते १ यावेळेत महिला न्याय हक्क परिषद होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ७:३० वाजता त्यांचा दोंडाईचात रोड शो होईल.

देशात काँग्रेसची सत्ता येताच वर्षभरातच सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणना करून समाज जीवनाचा एकप्रकारे एक्स-रे करणार आहोत. कारण, त्यातूनच खरा उपचार होणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने २२ उद्योगपतींना १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. ‘मनरेगा’चे वार्षिक बजेट ६५ हजार कोटींचे असते. हे सूत्र लक्षात घेतल्यास २४ वर्षांची ‘मनरेगा’ची रक्कम सरकारने माफ केली आहे. - राहुल गांधी, काँग्रेस नेते. 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी