शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

हृदयद्रावक! नवापुरात तिघांची आत्महत्या, मुलगा आणि सुनेचा मृतदेह पाहून पित्यानेही दिला रेल्वेखाली जीव

By भूषण.विजय.रामराजे | Updated: May 23, 2023 18:53 IST

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील तीनटेंबा भागातील युवकाने पत्नीसह रेल्वेखाली उडी घेत, आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला.

- भूषण रामराजे नंदुरबार -  जिल्ह्यातील नवापूर शहरातील तीनटेंबा भागातील युवकाने पत्नीसह रेल्वेखाली उडी घेत, आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. वडिलांनी मोटारसायकल घेण्यास नकार दिल्याने त्याने हा निर्णय घेतला. तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या मुलाने पत्नीसह आत्महत्या केल्याचे दिसून आल्यानंतर, पित्यानेही क्षणाचा विचार न करता, धावत्या रेल्वेत स्वत:ला झोकून दिल्याची ही घटना आहे. घटनेमुळे नवापूर परिसरासह नंदुरबार जिल्हा हादरला आहे.

सावन सय्यद गावित (२१), रोशनी सावन गावित (१९) आणि सय्यद कर्मा गावित (५०) अशी मयतांची नावे आहेत. शहरातील तीनटेंबा भागात रहिवासी असलेल्या रहिवासी सय्यद कर्मा गावित यांचा मुलगा सावन याने सोमवारी रात्री जेवण सुरू असताना नवीन मोटारसायकलीची मागणी केली होती. यावेळी सय्यद गावित यांनी मोटारसायकल घेण्यास नकार दिला होता. यातून घरात किरकोळ वाद झाला होता. हा वाद संपल्यावर सावन हा पत्नी रोशनी हिच्यासह घराबाहेर पडला होता. घराबाहेर पडल्यावर फुलफळी भागातील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेखाली पत्नीसह उडी घेत, सावन याने जीवनयात्रा संपविली होती. रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची माहिती सय्यद गावित यांना कळल्यावर त्यांनी फुलफळी भागात धाव घेतली होती. दरम्यान, या ठिकाणी मुलगा आणि सुनेचा मृतदेह पाहून भावनाविवश होत, त्यांनीही धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. हा प्रकार सय्यद यांच्या पत्नी सुमित्रा यांना कळल्यावर, त्यांनी एकच हंबरडा फोडला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर, फुलफळी, तीनटेंबा, देवलफळीसह शहरातील नागरिकांनी रेल्वे रुळाकडे धाव घेतली होती.

माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ, जमादार युवराज परदेशी, विकी वाघ यांना घटनास्थळी धाव घेतली होती. तिघांच्या मृतदेहाचे नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.सय्यद गावित हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना चार मुली आणि सावन हा एकच मुलगा होता. फेब्रुवारी महिन्यात त्याचा विवाह देवलफळी भागातील रोशनी यांच्यासोबत झाला होता. संसार सुखाचा सुरू असताना, मुलाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी तिघांवर सामूहिकरीत्या अंत्यविधी करण्यात आला.

टॅग्स :Deathमृत्यूFamilyपरिवार