शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

हृदयद्रावक! नवापुरात तिघांची आत्महत्या, मुलगा आणि सुनेचा मृतदेह पाहून पित्यानेही दिला रेल्वेखाली जीव

By भूषण.विजय.रामराजे | Updated: May 23, 2023 18:53 IST

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील तीनटेंबा भागातील युवकाने पत्नीसह रेल्वेखाली उडी घेत, आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला.

- भूषण रामराजे नंदुरबार -  जिल्ह्यातील नवापूर शहरातील तीनटेंबा भागातील युवकाने पत्नीसह रेल्वेखाली उडी घेत, आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. वडिलांनी मोटारसायकल घेण्यास नकार दिल्याने त्याने हा निर्णय घेतला. तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या मुलाने पत्नीसह आत्महत्या केल्याचे दिसून आल्यानंतर, पित्यानेही क्षणाचा विचार न करता, धावत्या रेल्वेत स्वत:ला झोकून दिल्याची ही घटना आहे. घटनेमुळे नवापूर परिसरासह नंदुरबार जिल्हा हादरला आहे.

सावन सय्यद गावित (२१), रोशनी सावन गावित (१९) आणि सय्यद कर्मा गावित (५०) अशी मयतांची नावे आहेत. शहरातील तीनटेंबा भागात रहिवासी असलेल्या रहिवासी सय्यद कर्मा गावित यांचा मुलगा सावन याने सोमवारी रात्री जेवण सुरू असताना नवीन मोटारसायकलीची मागणी केली होती. यावेळी सय्यद गावित यांनी मोटारसायकल घेण्यास नकार दिला होता. यातून घरात किरकोळ वाद झाला होता. हा वाद संपल्यावर सावन हा पत्नी रोशनी हिच्यासह घराबाहेर पडला होता. घराबाहेर पडल्यावर फुलफळी भागातील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेखाली पत्नीसह उडी घेत, सावन याने जीवनयात्रा संपविली होती. रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची माहिती सय्यद गावित यांना कळल्यावर त्यांनी फुलफळी भागात धाव घेतली होती. दरम्यान, या ठिकाणी मुलगा आणि सुनेचा मृतदेह पाहून भावनाविवश होत, त्यांनीही धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. हा प्रकार सय्यद यांच्या पत्नी सुमित्रा यांना कळल्यावर, त्यांनी एकच हंबरडा फोडला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर, फुलफळी, तीनटेंबा, देवलफळीसह शहरातील नागरिकांनी रेल्वे रुळाकडे धाव घेतली होती.

माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ, जमादार युवराज परदेशी, विकी वाघ यांना घटनास्थळी धाव घेतली होती. तिघांच्या मृतदेहाचे नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.सय्यद गावित हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना चार मुली आणि सावन हा एकच मुलगा होता. फेब्रुवारी महिन्यात त्याचा विवाह देवलफळी भागातील रोशनी यांच्यासोबत झाला होता. संसार सुखाचा सुरू असताना, मुलाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी तिघांवर सामूहिकरीत्या अंत्यविधी करण्यात आला.

टॅग्स :Deathमृत्यूFamilyपरिवार