शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! नवापुरात तिघांची आत्महत्या, मुलगा आणि सुनेचा मृतदेह पाहून पित्यानेही दिला रेल्वेखाली जीव

By भूषण.विजय.रामराजे | Updated: May 23, 2023 18:53 IST

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील तीनटेंबा भागातील युवकाने पत्नीसह रेल्वेखाली उडी घेत, आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला.

- भूषण रामराजे नंदुरबार -  जिल्ह्यातील नवापूर शहरातील तीनटेंबा भागातील युवकाने पत्नीसह रेल्वेखाली उडी घेत, आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. वडिलांनी मोटारसायकल घेण्यास नकार दिल्याने त्याने हा निर्णय घेतला. तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या मुलाने पत्नीसह आत्महत्या केल्याचे दिसून आल्यानंतर, पित्यानेही क्षणाचा विचार न करता, धावत्या रेल्वेत स्वत:ला झोकून दिल्याची ही घटना आहे. घटनेमुळे नवापूर परिसरासह नंदुरबार जिल्हा हादरला आहे.

सावन सय्यद गावित (२१), रोशनी सावन गावित (१९) आणि सय्यद कर्मा गावित (५०) अशी मयतांची नावे आहेत. शहरातील तीनटेंबा भागात रहिवासी असलेल्या रहिवासी सय्यद कर्मा गावित यांचा मुलगा सावन याने सोमवारी रात्री जेवण सुरू असताना नवीन मोटारसायकलीची मागणी केली होती. यावेळी सय्यद गावित यांनी मोटारसायकल घेण्यास नकार दिला होता. यातून घरात किरकोळ वाद झाला होता. हा वाद संपल्यावर सावन हा पत्नी रोशनी हिच्यासह घराबाहेर पडला होता. घराबाहेर पडल्यावर फुलफळी भागातील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेखाली पत्नीसह उडी घेत, सावन याने जीवनयात्रा संपविली होती. रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची माहिती सय्यद गावित यांना कळल्यावर त्यांनी फुलफळी भागात धाव घेतली होती. दरम्यान, या ठिकाणी मुलगा आणि सुनेचा मृतदेह पाहून भावनाविवश होत, त्यांनीही धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. हा प्रकार सय्यद यांच्या पत्नी सुमित्रा यांना कळल्यावर, त्यांनी एकच हंबरडा फोडला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर, फुलफळी, तीनटेंबा, देवलफळीसह शहरातील नागरिकांनी रेल्वे रुळाकडे धाव घेतली होती.

माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ, जमादार युवराज परदेशी, विकी वाघ यांना घटनास्थळी धाव घेतली होती. तिघांच्या मृतदेहाचे नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.सय्यद गावित हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना चार मुली आणि सावन हा एकच मुलगा होता. फेब्रुवारी महिन्यात त्याचा विवाह देवलफळी भागातील रोशनी यांच्यासोबत झाला होता. संसार सुखाचा सुरू असताना, मुलाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी तिघांवर सामूहिकरीत्या अंत्यविधी करण्यात आला.

टॅग्स :Deathमृत्यूFamilyपरिवार