शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भागवत सप्ताहात सामूहिक विवाह, पाच जोडप्यांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 08:27 IST

तळोदा तालुक्यातील धानोरा येथे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील धानोरा येथे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या समारोपात समाजातील पाच गरीब जोडप्यांचा सामुहिक विवाह लावण्यात आला. गावातील भागवत सेवा समिती व यजमानांच्या अशा आदर्श कार्याचे कौतुक केले जात आहे.तळोदा तालुक्यातील धानोरा येथील दोडे गुजर समाजातील भागवत सेवा समिती व यजमान तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय रमेश चौधरी यांनी ७ मार्च २०१९ पासून श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहाचा समारोप गुरुवारी करण्यात आला. याप्रसंगी समाजातील गरीब कुटुंबातील पाच जोडप्यांचे शुभमंगल समाजाच्या चालीरितीनुसार, पुरोहितांच्या मंत्रोपच्चाराने लावण्यात आले. कार्यक्रमास खासदार डॉ.हीना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, माजीमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, डॉ.शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, दोडे गुजर समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, व्यंकट पाटील, कृष्णदास पाटील, रघुवीर चौधरी, रतिलाल पाटील, तुंबडू पाटील, मोतीराम पाटील, हरकलाल पाटील, जगन चौधरी, गजानन पाटील, अरुण पाटील, गोपाळ चौधरी, विनोद चौधरी आदींसह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमास खासदार डॉ.गावीत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भागवत सप्ताहातच समितीने समाजातील गरीब जोडप्याचे सामूहिक विवाह आयोजित केल्याने निश्चितच कौतुकास्पद कार्य आहे. त्यामुळे त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. अशा प्रकारचे सामूहिक विवाह सोहळे मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचे आवाहनही केले. या वेळी आमदार डॉ.गावीत, आमदार पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक पोलीस पाटील बापू पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शुभम चौधरी तर आभार संजय रमेश चौधरी यांनी मानले. कथेचे निरूपन खगेंद्र महाराज ब्राह्मणपुरीकर यांनी केले. सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.समाजातील दात्यांनी वधू-वरांना केली मदतरतिलाल पाटील, मोतीराम पाटील, रघुवीर चौधरी, दगडू पाटील, कृष्णदास पाटील, आनंदा पाटील, दशरथ पाटील, अश्विन चौधरी, संतोष पाटील, लक्ष्मण पाटील, संजय पाटील, धरमदास पाटील, तुमडू पाटील, गजानन पाटील, जगन चौधरी, हरकलाल पाटील, विनोद चौधरी, गोपाळ चौधरी, राजेंद्र चौधरी, मुकेश पाटील, अरूण पाटील, सोमेश पाटील, कुणाल पाटील, अर्जुन पाटील, आंबालाल पाटील, कमलेश पाटील आदी समाज बांधवांनी वधू-वरांना वस्तू स्वरूपात मदत केली. या सर्व दात्यांचा गौरव करण्यात आला होता. समाजातील कुकरमुंडा येथील महेंद्र पाटील यांचाही गौरव करण्यात आला.

टॅग्स :marriageलग्न