शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
3
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
4
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
5
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
6
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
7
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
8
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
9
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
10
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
11
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
12
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
13
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
14
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
15
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
16
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
17
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
18
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
19
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
20
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स

भागवत सप्ताहात सामूहिक विवाह, पाच जोडप्यांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 08:27 IST

तळोदा तालुक्यातील धानोरा येथे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील धानोरा येथे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या समारोपात समाजातील पाच गरीब जोडप्यांचा सामुहिक विवाह लावण्यात आला. गावातील भागवत सेवा समिती व यजमानांच्या अशा आदर्श कार्याचे कौतुक केले जात आहे.तळोदा तालुक्यातील धानोरा येथील दोडे गुजर समाजातील भागवत सेवा समिती व यजमान तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय रमेश चौधरी यांनी ७ मार्च २०१९ पासून श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहाचा समारोप गुरुवारी करण्यात आला. याप्रसंगी समाजातील गरीब कुटुंबातील पाच जोडप्यांचे शुभमंगल समाजाच्या चालीरितीनुसार, पुरोहितांच्या मंत्रोपच्चाराने लावण्यात आले. कार्यक्रमास खासदार डॉ.हीना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, माजीमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, डॉ.शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, दोडे गुजर समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, व्यंकट पाटील, कृष्णदास पाटील, रघुवीर चौधरी, रतिलाल पाटील, तुंबडू पाटील, मोतीराम पाटील, हरकलाल पाटील, जगन चौधरी, गजानन पाटील, अरुण पाटील, गोपाळ चौधरी, विनोद चौधरी आदींसह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमास खासदार डॉ.गावीत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भागवत सप्ताहातच समितीने समाजातील गरीब जोडप्याचे सामूहिक विवाह आयोजित केल्याने निश्चितच कौतुकास्पद कार्य आहे. त्यामुळे त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. अशा प्रकारचे सामूहिक विवाह सोहळे मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचे आवाहनही केले. या वेळी आमदार डॉ.गावीत, आमदार पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक पोलीस पाटील बापू पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शुभम चौधरी तर आभार संजय रमेश चौधरी यांनी मानले. कथेचे निरूपन खगेंद्र महाराज ब्राह्मणपुरीकर यांनी केले. सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.समाजातील दात्यांनी वधू-वरांना केली मदतरतिलाल पाटील, मोतीराम पाटील, रघुवीर चौधरी, दगडू पाटील, कृष्णदास पाटील, आनंदा पाटील, दशरथ पाटील, अश्विन चौधरी, संतोष पाटील, लक्ष्मण पाटील, संजय पाटील, धरमदास पाटील, तुमडू पाटील, गजानन पाटील, जगन चौधरी, हरकलाल पाटील, विनोद चौधरी, गोपाळ चौधरी, राजेंद्र चौधरी, मुकेश पाटील, अरूण पाटील, सोमेश पाटील, कुणाल पाटील, अर्जुन पाटील, आंबालाल पाटील, कमलेश पाटील आदी समाज बांधवांनी वधू-वरांना वस्तू स्वरूपात मदत केली. या सर्व दात्यांचा गौरव करण्यात आला होता. समाजातील कुकरमुंडा येथील महेंद्र पाटील यांचाही गौरव करण्यात आला.

टॅग्स :marriageलग्न