अनरद येथे शहिदांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:31 IST2021-07-28T04:31:58+5:302021-07-28T04:31:58+5:30
कार्यक्रमास जिल्हा गोरक्षा प्रमुख राजाभाऊ साळी, वृक्षसंवर्धन प्रतिष्ठानचे पदाधिकारी ॲड. गोविंद पाटील, प्रा. ज्ञानी कुलकर्णी, के.के. सोनार, सावता ...

अनरद येथे शहिदांना अभिवादन
कार्यक्रमास जिल्हा गोरक्षा प्रमुख राजाभाऊ साळी, वृक्षसंवर्धन प्रतिष्ठानचे पदाधिकारी ॲड. गोविंद पाटील, प्रा. ज्ञानी कुलकर्णी, के.के. सोनार, सावता फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र माळी, पोलीस पाटील दिनेश पाटील, बजरंग दलाचे केशव पाठक उपस्थित होते. या वेळी सेना दलातील जवान भटू बाविस्कर यांचा सन्मान करण्यात आला. बाविस्कर यांनी सेना दलातील आपले अनुभव व्यक्त केले. जिजाबराव बाविस्कर यांनी स्वरचित शौर्यगीत गायले. या वेळी विकी तांबोळी, ललित पाटील, जितेंद्र गिरासे, सुनील पाटील, अनिल पाटील, नवल वाघ, सदानंद वाघ, तुषार पाटील, मनोज वाघ, मयूर माळी, मनोज पाटील, दिनेश चौधरी उपस्थित होते. या वेळी नुकतेच शहीद झालेले कळंबू येथील जवान स्व. नीलेश महाजन यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.