शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलक सिताबाई तडवी यांच्यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या  सीताबाई तडवी यांचा मृत्यू झाला होता. ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या  सीताबाई तडवी यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी अंबाबारी ता.अक्कलकुवा आणल्यानंतर शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंबाबारी येथे शेकडोंच्या संख्येने नागरीक उपस्थित होते. ग्रामस्थांनी दिवसभर चुली बंद ठेवून सिताबाईंना श्रध्दांजली वाहिली. सीताबाई ह्या  विस्थापितांच्या प्रश्नासाठी शासन दरबारी लढत होत्या. त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. अंत्ययात्रेत लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे, माजीमंत्री पद्माकर वळवी यांच्यासह जिल्हाभरातून नागरीक सहभागी झाले होते.  दिल्ली येथे केंद्रशासनाच्या शेतकरीविरोधी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या दोन महिनंपासून शेतकरीच आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात लोक संघर्ष मोर्चाचे जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. याच आंदोलनात आंबाबारी सीताबाई रामदास तडवी लोकसंघर्षतर्फे सहभागी होत्या. त्या कार्यकर्त्यांसह  शाहजहाँपुर बॉर्डर वर आंदोलन करीत होत्या.  प्रजासत्ताक दिनी झालेल्या परेडमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. परेड संपल्यानंतर त्या कार्यकर्त्यांसोबत  गावाकडे येण्यासाठी निघाल्या होत्या. त्यातच रेल्वे स्थानकावर येताना त्यांचा अचानक मृत्यू झाला होता. गुरुवारी रात्री विशेष रुग्णवाहिकेने त्यांचा मृतदेह अक्कलकुवा तालुक्याकडे रवाना करण्यात आला होता.  त्यांचा मृतदेह  शुक्रवारी सकाळी अंबाबारी येथे आणल्यानंतर गावातील स्मशाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  सीताबाई  यांच्या अचानक निधनाने ग्रामस्थांनी एक दिवसाचा उपवास करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.  सीताबाई यांच्या पश्चात पती, मुलगा व चार मुली असा परिवार आहे.

विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली 

  • मयत सीताबाई यांना विधानसभेच्या उपाध्यक्ष निलम गो-हे यांनीही पाठवलेल्या श्रद्धांजली अर्पण करत त्यांचे बलिदान वाया जाणार नसल्याचे म्हटले आहे. 
  •  सीताबाई यांना देशभसह सयूंक्त किसान मोर्चा अखील भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, जनआंदोलनांची संघर्ष समिती महाराष्ट्र आणि विविध राज्यातील किसान संघटनांकडूनही श्रद्धांजली वाहण्यात आली. कांग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राजू शेट्टी, पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, गजानन खातू पूर्णिमा, चिकरमाने सुभाष वारे यांनीही शोकसंदेश दिले होते. राज्यातील विविध भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही शोक संदेश पाठवले होते.