शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
5
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
6
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
7
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
8
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
9
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
10
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
11
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
12
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
13
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
14
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
15
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
16
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
17
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
18
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
19
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
20
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?

पाच वर्षात 201 हेक्टर क्षेत्राला फळ विमा संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 12:41 IST

नंदुरबार : कृषी विभागाकडून फळ बागायतदार शेतक:यांसाठी लागू केलेल्या हवामानआधारित फळपीक विमा योजनेत जिल्ह्यात उत्पादित होणारे एकच फळ समाविष्ट ...

नंदुरबार : कृषी विभागाकडून फळ बागायतदार शेतक:यांसाठी लागू केलेल्या हवामानआधारित फळपीक विमा योजनेत जिल्ह्यात उत्पादित होणारे एकच फळ समाविष्ट असल्याने ही विमा योजना शेतक:यांसाठी मृगजळ ठरत आह़े विम्याचे हप्ते भरुनही लाभाची शाश्वती नसल्याने शेतकरी यातून बाहेर पडत आहेत़ परिणामी 2012 ते 2017 या पाच वर्षात केवळ 143 शेतकरी विमा योजनेत सहभागी झाल्याचे दिसून आल़े 3 लाख 17 हजार शेतीक्षेत्र असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात दोन लाख 72 हजार क्षेत्रावर हंगामी तर साधारण 30 हजार हेक्टरवर फळबागा लागवड करण्यात येत़े यात प्रामुख्याने केळी, पपई, पेरु, डाळींब, लिंबू यासह विविध फळ पिकांचा समावेश आह़े या फळ पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देण्यासाठी कृषी विभागाकडून दरवर्षी फळपिक विमा योजना लागू करण्यात येत़े शेतक:यांकडून क्षेत्रनिहाय विमा उतरवण्याच्या या प्रक्रियेला एक किंवा दोन दिवसांची मुदत देण्यात येऊन त्यांचा पिकांचा विमा उतरवण्याचा प्रकार गेल्या काही वर्षापासून सुरु आह़े प्रामुख्याने पिकाला संरक्षण देण्याची ही योजना शेवटच्या शेतक:यार्पयत पोहोचवण्याची जबाबदारी असताना विभागाकडून तातडीने विमा करण्यात येत असल्याने फळबागायतदार यापासून वंचित राहत असल्याचे सांगण्यात येत आह़े तर विमा करुनही परतावा मिळण्याची हमी नसल्याने शेतकरी या विमा योजनेपासून लांब राहत असल्याचेही कारण समोर आले आह़े 2012 पासून या योजनेत समाविष्ट झालेल्या शेतक:यांपैकी 2014-15  या वर्षात गारपीटग्रस्त असलेल्या तीनच शेतक:यांना लाभ देण्यात आल्याची माहितीही समोर आली आह़े केळी वगळता इतर पिकांचा योजनेत न होणारा समावेश ख:या अर्थाने चिंतेचे कारण असून यासाठी कृषी विभागाने शेतक:यांची भेट घेत योजना समजावून देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े 2012-13 या वर्षात जिल्ह्यातील 66 शेतक:यांनी फळपिक विमा योजनेत सहभाग दिला होता़ यातून 109 हेक्टर क्षेत्र विम्याखाली होती़ यासाठी शासनाने 1 कोटी 9 लाख रुपयांचे हप्ते भरले होत़े यातून त्याच वर्षी शेतक:यांना 81 लाख 95 हजार रुपयांची भरपाई मिळाली होती़ सर्व 66 शेतकरी यासाठी पात्र ठरले होत़े 2013-14 या वर्षात विमा योजनेत 30 शेतकरी सहभागी झाले होत़े यातून 31 हजार 49 हेक्टर क्षेत्र संरक्षणाखाली आले होत़े यातून 3 शेतक:यांना 1 लाख 19 हजार रुपयांची भरपाई देण्यात आली होती़ 2014-15 या वर्षात तब्बल 150 शेतकरी या योजनेत सहभागी झाले होत़े यातून 206 क्षेत्र संरक्षित झाले होत़े यावर्षात 57 शेतक:यांना 22 लाख 73 लाख रुपयांची मदत देण्यात आली होती़ शासनाकडून 1 कोटी 55 लाख 13 हजार रुपयांचा विमा हप्ता जमा करण्यात आला होता़ यात शेतक:यांचे 24 लाख तर शासनाकडून 7 लाख 75 हजार रुपयांची सबसिडी देण्यात आली होती़ याचवर्षात गारपीटग्रस्त तीन शेतक:यांना 1 लाख 77 हजार रुपयांची मदत देण्यात आली होती़ 2016-17 या वर्षात 143 शेतक:यांनी विमा करवून घेतला होता़ यातून 201़ 34 हेक्टर क्षेत्र संरक्षित झत्तले होत़े यासाठी 2 कोटी 45 लाख 61 हजार 144 रुपयांचे हप्ते भरण्यात आले होत़े परंतू एकाही शेतक:याला भरपाई देण्यात आली नव्हती़ विशेष म्हणजे यावर्षी दुष्काळी स्थिती असतानाही मदत मिळाली नाही़