शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात 201 हेक्टर क्षेत्राला फळ विमा संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 12:41 IST

नंदुरबार : कृषी विभागाकडून फळ बागायतदार शेतक:यांसाठी लागू केलेल्या हवामानआधारित फळपीक विमा योजनेत जिल्ह्यात उत्पादित होणारे एकच फळ समाविष्ट ...

नंदुरबार : कृषी विभागाकडून फळ बागायतदार शेतक:यांसाठी लागू केलेल्या हवामानआधारित फळपीक विमा योजनेत जिल्ह्यात उत्पादित होणारे एकच फळ समाविष्ट असल्याने ही विमा योजना शेतक:यांसाठी मृगजळ ठरत आह़े विम्याचे हप्ते भरुनही लाभाची शाश्वती नसल्याने शेतकरी यातून बाहेर पडत आहेत़ परिणामी 2012 ते 2017 या पाच वर्षात केवळ 143 शेतकरी विमा योजनेत सहभागी झाल्याचे दिसून आल़े 3 लाख 17 हजार शेतीक्षेत्र असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात दोन लाख 72 हजार क्षेत्रावर हंगामी तर साधारण 30 हजार हेक्टरवर फळबागा लागवड करण्यात येत़े यात प्रामुख्याने केळी, पपई, पेरु, डाळींब, लिंबू यासह विविध फळ पिकांचा समावेश आह़े या फळ पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देण्यासाठी कृषी विभागाकडून दरवर्षी फळपिक विमा योजना लागू करण्यात येत़े शेतक:यांकडून क्षेत्रनिहाय विमा उतरवण्याच्या या प्रक्रियेला एक किंवा दोन दिवसांची मुदत देण्यात येऊन त्यांचा पिकांचा विमा उतरवण्याचा प्रकार गेल्या काही वर्षापासून सुरु आह़े प्रामुख्याने पिकाला संरक्षण देण्याची ही योजना शेवटच्या शेतक:यार्पयत पोहोचवण्याची जबाबदारी असताना विभागाकडून तातडीने विमा करण्यात येत असल्याने फळबागायतदार यापासून वंचित राहत असल्याचे सांगण्यात येत आह़े तर विमा करुनही परतावा मिळण्याची हमी नसल्याने शेतकरी या विमा योजनेपासून लांब राहत असल्याचेही कारण समोर आले आह़े 2012 पासून या योजनेत समाविष्ट झालेल्या शेतक:यांपैकी 2014-15  या वर्षात गारपीटग्रस्त असलेल्या तीनच शेतक:यांना लाभ देण्यात आल्याची माहितीही समोर आली आह़े केळी वगळता इतर पिकांचा योजनेत न होणारा समावेश ख:या अर्थाने चिंतेचे कारण असून यासाठी कृषी विभागाने शेतक:यांची भेट घेत योजना समजावून देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े 2012-13 या वर्षात जिल्ह्यातील 66 शेतक:यांनी फळपिक विमा योजनेत सहभाग दिला होता़ यातून 109 हेक्टर क्षेत्र विम्याखाली होती़ यासाठी शासनाने 1 कोटी 9 लाख रुपयांचे हप्ते भरले होत़े यातून त्याच वर्षी शेतक:यांना 81 लाख 95 हजार रुपयांची भरपाई मिळाली होती़ सर्व 66 शेतकरी यासाठी पात्र ठरले होत़े 2013-14 या वर्षात विमा योजनेत 30 शेतकरी सहभागी झाले होत़े यातून 31 हजार 49 हेक्टर क्षेत्र संरक्षणाखाली आले होत़े यातून 3 शेतक:यांना 1 लाख 19 हजार रुपयांची भरपाई देण्यात आली होती़ 2014-15 या वर्षात तब्बल 150 शेतकरी या योजनेत सहभागी झाले होत़े यातून 206 क्षेत्र संरक्षित झाले होत़े यावर्षात 57 शेतक:यांना 22 लाख 73 लाख रुपयांची मदत देण्यात आली होती़ शासनाकडून 1 कोटी 55 लाख 13 हजार रुपयांचा विमा हप्ता जमा करण्यात आला होता़ यात शेतक:यांचे 24 लाख तर शासनाकडून 7 लाख 75 हजार रुपयांची सबसिडी देण्यात आली होती़ याचवर्षात गारपीटग्रस्त तीन शेतक:यांना 1 लाख 77 हजार रुपयांची मदत देण्यात आली होती़ 2016-17 या वर्षात 143 शेतक:यांनी विमा करवून घेतला होता़ यातून 201़ 34 हेक्टर क्षेत्र संरक्षित झत्तले होत़े यासाठी 2 कोटी 45 लाख 61 हजार 144 रुपयांचे हप्ते भरण्यात आले होत़े परंतू एकाही शेतक:याला भरपाई देण्यात आली नव्हती़ विशेष म्हणजे यावर्षी दुष्काळी स्थिती असतानाही मदत मिळाली नाही़