थकीत कर्ज माफ करुन वन पोल वन डिपी उपक्रमात शेतकऱ्यांना सामील कराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:13 IST2020-03-05T12:12:52+5:302020-03-05T12:13:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागात वनपोल वन डीपी या उपक्रमात थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना सामावून ...

थकीत कर्ज माफ करुन वन पोल वन डिपी उपक्रमात शेतकऱ्यांना सामील कराव
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागात वनपोल वन डीपी या उपक्रमात थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे़ या योजनेची व्याप्ती वाढवून उर्वरित शेतकºयांनाही वीज जोडणी देण्याची मागणी जोर धरु लागली आहे़
शहादा विभागात तळोदा, अक्कलकुवा, धडगाव आणि शहादा या चार तालुक्यांमध्ये २७ हजार ५०० कृषीपंपधारक शेतकरी आहेत़ या शेतकºयांना गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने शेतकºयांच्या चिंता वाढल्या आहेत़ अनेक महिन्यांपासून वीज पुरवठा कमी अधिक प्रमाणात होत असल्याने शेतकºयांचे सबमर्सिबल पंप जळून नुकसानीला सामोरे जावे लागत आहे़ यावर पर्याय म्हणून शासनाने वन पोल वन डिपी हा उपक्रम सुरु केला आहे़ परंतू यात शहादा विभागातून केवळ १ हजार २०० शेतकºयांना जोडण्या देण्यात आल्या आहेत़ या जोडण्या वाढवण्याची कारवाई करण्याची मागणी शेतकºयांची आहे़ परंतू अद्याप मंजूर करण्यात आलेल्या १ हजार २०० शेतकºयांनाही वीज पुरवठा पूर्णपणे होत नसल्याचे सुरु आहे़ यातून मग शेतकºयांच्या अडचणी वाढत आहे़ वन पोल वन डीपी उपक्रमामुळे निर्धारित आणि सुरक्षित वीज पुरवठा होणार असल्याने शेतकºयांना पिकांना सुरळीतपणे पाणी देणे शक्य होऊन वीज बचत होणार आहे़ यातून थकबाकीची समस्या पूर्णपणे दूर होणार असल्याने विभागाने तातडीने हे काम वाढवण्याची मागणी आहे़
याबाबत वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागाचे कार्यकारी अभियंता किसन पावरा यांच्यासोबत चर्चा केली असता, त्यांनी वन पोल या योजनेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे़ नवीन लाभार्थींबाबत शासनाने आदेश केल्यानंतर कामकाज पूर्ण करणार असल्याची माहिती दिली आहे़
दरम्यान चारही तालुक्यात थकबाकीदार शेतकºयांची संख्या मोठी आहे़ बहुतांश शेतकºयांचे बिल हे पाच ते १० हजारापेक्षा अधिक नसल्याने ते माफ करुन नवीन जोडणी ूदेण्याची गरज आहे़ गेल्या काही वर्षात शेतकºयांना नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या नुकसानीमुळे किरकोळ स्वरुपाचे बिल वजा करुन नवीन सुरुवात करण्याची मागणी चारही तालुक्यातून जोर धरत आहे़