बिबटय़ाच्या बंदोबस्तकडे वनविभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:56 IST2019-11-28T12:56:41+5:302019-11-28T12:56:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा/प्रतापपूर : मानवी वसाहतींकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसात धवळीविहीर, प्रतापपूर व रांझणी या गावांमध्ये ...

बिबटय़ाच्या बंदोबस्तकडे वनविभागाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा/प्रतापपूर : मानवी वसाहतींकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसात धवळीविहीर, प्रतापपूर व रांझणी या गावांमध्ये बिबटय़ाने पाळीव पाण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहे. या बिबटय़ाच्या बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे, परंतु वन विभागामार्फत या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सातपुडय़ातील वन्यप्राणी वारंवार तळोदा तालक्यातील मानवी वसाहतींमध्ये शिकारीचा शोधात धाव घेत आहे. त्यात प्रमाुख्याने बिबटय़ाचा अधिक वावर असल्याचे दिसून येत आहे. या बिबटय़ाने रांझणी येथील शरद निंबा मराठे यांच्या मेंढपाळ तानू मानू भापकर हे मेंढय़ांसह वास्तव्यास होते. बिबटय़ाने मेंढय़ांच्या कळपावर हल्ला करीत दोन मेंढय़ा फस्त केल्या. यापूर्वी प्रतापपूर येथील विजय पाटील, छोटू पावरा, राजाराम गुंजाळे यांच्या पाळीव पाण्यांवर बिबटय़ाने हल्ला करीत त्यांना ठार केले. मेंढय़ांवरील हल्ल्यांशिवाय 26 नोव्हेंबर रोजी धवळीविहीर ता.तळोदा येथील जयसिंग रतिलाल पावरा हे गुरे चारुन घराकडे येत असताना बिबटय़ाने पाळीव प्राण्यांवर हल्ला करीत त्यांना ठार केले. रांझणी व धवळीविहीर या दोन्ही घटनांचा वनविभागामार्फत पंचनामे देखील करण्यात आले. रांझणी येथी नुकसानीचा पंचनामा वनपाल एन.पी.पाटील, वनरक्षक एल.टी.पावरा यांनी केला तर धवळीविहीर येथील नुकसानीचा देखील पंचनामा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पंचनामा करतांना दोन्ही ठिकाणच्या नुकसानग्रस्तांसह नागरिकांमार्फत बिबटय़ाच्या बंदोबस्तसाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. परंतु या मागणीकररडे वन विभागामार्फत दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पशुपालकांसह नागरकांमार्फत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
बिबटय़ाच्या भितीमुळे तालुक्यातील रब्बी हंगामातील शेतीची कामांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. ही कामे वेळोवर पूर्ण करण्यासाठी वन विभागामार्फत तालुक्यात ठिकठिकाणी पिजरे लावण्यात यावे, अशी मागणी पुन्हा करण्यात येत आहे. वन विभागामार्फत बिबटय़ाच्या बंदोबस्त न झाल्यास वन विभागाविरुद्ध आंदोलन करण्यात येणार असल्याचे नागरिकांमार्फत सांगण्यात येत आहे. अशा घटना तळोदा तालुक्यात वारंवार घडत असल्यामुळे यंदाच्या मागणीनपुसार वन विभागामार्फत कुठली भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागले आहे.