शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
2
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
3
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
4
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
5
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
6
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
7
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
8
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
9
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
10
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
11
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
12
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
13
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
14
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
15
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
16
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
17
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
19
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
20
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?

पाण्याचे वॉटर ऑडीटसाठी आता फ्लो वॉटर मिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 4:48 PM

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार पालिकेला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पातील दोन्ही मुख्य जलवाहिनींवर वॉटर फ्लो मिटर बसविण्यात ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार पालिकेला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पातील दोन्ही मुख्य जलवाहिनींवर वॉटर फ्लो मिटर बसविण्यात येत आहे. यामुळे धरणातील किती पाणी पालिका घेते, प्रत्यक्षात किती पाणीपुरवठा होतो याची नोंद ठेवली जाणार आहे. या कामाला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. यामुळे शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शहराचे लवकरच वॉटर ऑडीट केले जाणार असून त्यानंतर सध्याच्या उन्हाळ्यात पाणी पुरवठा किती काळ करावा याचा निर्णय घेतला जाणार आहे.नंदुरबार शहराला शिवण नदीवरील विरचक प्रकल्पातून मुख्यत: पाणी पुरवठा केला जातो. याशिवाय 25 ते 30 टक्के भागात आंबेबारा धरणातील पाण्याचा आष्टे पंपींग स्टेशनमधून उपसा करण्यात येतो. शासनाच्या आदेशानुसार आता ज्या धरणातून, प्रकल्पातून किंवा विहिरीतून पाणी घ्यावयाचे असेल तर त्यासाठी वॉटर फ्लो मिटर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार पालिकेने विरचक प्रकल्पातील दोन पाईपलाईनवर अशा प्रकारचे वॉटर मिटर बसविण्यास सुरुवात केली आहे.500 मि.मी.जलवाहिन्याविरचक प्रकल्पात असलेल्या इंटकवेल मधून पाणी उपसा करण्यासाठी 500 मि.मी.च्या दोन जलवाहिन्या आहेत. त्यातील पाणी तेथेच असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पात टाकले जाते. या दोन्ही जलवाहिन्यांवर 450 मि.मी. आकाराच्या पाईपमध्ये हे वॉटर फ्लो मिटर बसविण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता या कामाला सुरुवात करण्यात आली. पाणी पुरवठा विभागाचे सभापती कैलास पाटील यांच्यासह अभियंता व सर्व कर्मचारी या ठिकाणी दिवसभर ठाण मांडून होते. गुरुवारी सायंकाळर्पयत 70 टक्के काम पुर्ण करण्यात आले होते. मध्यरात्रीर्पयत काम पुर्ण करून लागलीच पाणी पंपींग करण्यास सुरवात होण्याची शक्यता आहे. जर काही तांत्रिक अडचणी आल्या नाहीच तर शुक्रवार, 25 रोजी दुपार्पयत काही भागातील पाणी पुरवठा सुरू करण्याचे नियोजन पाणी पुरवठा विभागाने करून ठेवले आहे. अंदाजे मोजमापआतार्पयत अंदाजे पाण्याचे मोजमाप केले जात होते. पाणी उपसा करणा:या विद्युत मोटारींची क्षमता, त्या किती तास चालल्या त्यावरून पाणी उपसाचा अंदाज काढला जात होता. तो अंदाज अचूक राहत नव्हता. त्यामुळे वॉटर ऑडीट करतांना किंवा धरणातील किती पाणीसाठा  उचलला हे जाणून घेण्यासाठी   अंदाजे आकडेवारी समोर आणावी लागत होती. आता वॉटर फ्लो मिटरमुळे ती आकडेवारी अचूक मिळणार आहे. पाणीसाठा आरक्षीतशहराला पाणी पुरवठासाठी विरचक प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला तर 50 टक्के पाणीसाठा हा पालिका आरक्षीत करतो. जर 60 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा झाला तर संपर्ण पाणीसाठा आरक्षीत केला जात असतो. यंदा तर केवळ 41 टक्केच पाणीसाठा झाल्याने संपुर्ण पाणीसाठा पालिकेने आरक्षीत केला आहे. अशीच स्थिती आंबेबारा धरणातील आहे. तेथील पाणीसाठा देखील पालिकेने आरक्षीत करून घेतला आहे. त्यामुळे दुष्काळी    स्थिती असूनही यंदा शहरवासीयांना पाणी टंचाईच्या स्थितीला फारसे सामोरे जावे लागणार नसल्याचे चित्र आहे.