वीरचक गावाजवळील फरशी पूल ठरतोय जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:54 IST2020-03-18T12:54:42+5:302020-03-18T12:54:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टे : नंदुरबार तालुक्यातील वीरचक गावाजवळील फरशी पुलाचा भराव पावसाळ्यात वाहून गेल्याने पूल अरुंद झाला असून ...

वीरचक गावाजवळील फरशी पूल ठरतोय जीवघेणा
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टे : नंदुरबार तालुक्यातील वीरचक गावाजवळील फरशी पुलाचा भराव पावसाळ्यात वाहून गेल्याने पूल अरुंद झाला असून तो वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरु पाहत आहे.
यंदा अतिवृष्टी झाल्याने वीरचक गावाजवळील फरशी पुलाचा भराव पुरात वाहून गेला. या पुलाचा भराव वाहून आठ महिने झाले तरी संबंधित विभागाकडून त्याची दुरुस्ती होत नसल्याने वाहनधारक व वीरचक ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत संबंधित विभागाला कळविण्यात आल्यानंतरही दुर्लक्ष होत असून येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.