शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

तळोद्यातील विद्याथ्र्याची पाच हजार रोपांची रोपवाटीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 1:07 PM

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : श्रमदान अन् स्वखर्चातून शहरातील महाविद्यालयीन तरुणानी रोप वाटीकेचे काम हाती घेतले असून,  विविध प्रजातीचे साधारण पाच हजार रोपे तयार करण्याचे त्यांचे नियोजन आहे. विशेष म्हणजे सर्व रोपे वेगवेगळ्या फल फळावळची असल्याने सातपुडय़ातील आदिवासींना रोजगार मिळणार आहे. कारण रोपे मुख्यता सातपुडय़ाच्या डोंगरावरच लावण्यात येणार आहे.     ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : श्रमदान अन् स्वखर्चातून शहरातील महाविद्यालयीन तरुणानी रोप वाटीकेचे काम हाती घेतले असून,  विविध प्रजातीचे साधारण पाच हजार रोपे तयार करण्याचे त्यांचे नियोजन आहे. विशेष म्हणजे सर्व रोपे वेगवेगळ्या फल फळावळची असल्याने सातपुडय़ातील आदिवासींना रोजगार मिळणार आहे. कारण रोपे मुख्यता सातपुडय़ाच्या डोंगरावरच लावण्यात येणार आहे.         एकेकाली गर्द झाडी व हिरवाईने नटलेला सतपुडा गेल्या तीन, चार दशकापासून उध्वस्त होत आहे. अलीकडे बेसुमार वृक्षतोडीमुळे तर आता पूर्णता बोडका झाला आहे. साहजिकच त्याचे वैभवदेखील लयास पावले आहे. त्याचे गत वैभव प्राप्त होण्यासाठी शहरातील दिग्विजय प्रतिष्ठानचे वृक्ष मित्र दिग्विजय माळी, प्रा.डॉ.महेंद्र माळी, हितेश वाघ, अंकित सूर्यवंशी, अजय परदेशी, जयदीप सूर्यवंशी, निखिल सागर, शिवम सूर्यवंशी, जागृत तवाले, मनोज कुमावत, सौरभ सूर्यवंशी, गौरव माळी अशा 15 महाविद्यालयीन तरुणांनी तळोदा महाविद्यालचे भूगोल विभागाचे प्रमुख प्रा.राजू यशोद यांचा सहकार्याने महाविद्यालयाच्या जागेवर म्हणजे पाच हजार स्क्वेअर फूट जागेवर  श्रमदान व स्वखर्चाने  रोपवाटीकेचे काम हाती घेतले आहे.गेल्या महीना भरपासून हे युवक तीव्र उन्हाची तमा न बाळगता अतिशय मेहनत घेवून काम करीत आहेत. आता पावेतो त्यांनी यावर आठ ते दहा हजार रुपये खर्च केल्याचे सांगितले. या रोपवाटीकेत मुख्यता महू, आंबा, सीताफल, जांभूळ, करवंद अशा प्रजातीची फळांची रोपे लावण्यात येत आहे. ही रोपे  दोन वर्षे चांगली वाढल्या नंतर लागवडीस देण्यात येणार आहेत. इथेच सेंद्रीय खतदेखील तयार करुण रोजगार निर्मितिचे प्रशिक्षण युवकांना दिले जाणार आहे. एकीकडे शासन लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवडीवर भर देत असल्याचे चित्र आहे. परंतु ते जगतीलच याची शास्वती नाही. तथापि हे तरुण शासनाकडून कुठलीच मदतीची अपेक्षा न करता स्वखर्चाने रोप वाटीका तयार करीत आहे. युवकांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.सातपुडय़ातील तरुणा ना रोजगार मिळणार:या रोप वाटीकेच्या माध्यमातून हे युवक हरीत सतपुडा अभियान राबविणार आहेत. कारण डोंगरावरच वृक्षांची लागवड करणार आहेत. त्यातही महू, आंबा, सीताफल या वृक्षावर  अधिक भर देणार असल्यामुळे तेथील आदिवासीना रोजगार प्राप्त होईल. असे असले तरी या तरुणांची वृक्ष लागवड चळवळीस इतर युवकांनी ही हातभार          लावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.