शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

परदेशातून आलेले पाच जण निगराणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 13:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : परदेशातून भारतात प्रवास करुन आलेल्या नागरिकांना वेगळे ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने शहरातील होळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : परदेशातून भारतात प्रवास करुन आलेल्या नागरिकांना वेगळे ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने शहरातील होळ तर्फे हवेली शिवारातील विद्यार्थिनी वसतीगृहात विलगीकरण कक्ष तयार केला आहे़ या कक्षात मंगळवारी सकाळपासून पाच नागरिकांना दाखल करण्यात आले आहे़जिल्हा सामान्य रुग्णालयात दक्षता म्हणून तयार करण्यात कोरोना विलगीकरण कक्षात तपासण्या करुन आतापर्यंत ३० जणांची तपासणी करण्यात आली होती़ यापैकी १० जणांचे नमुने हे तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही संस्थेकडे देण्यात आले होते़ हे सर्व आठ नमुने निगेटिव्ह आले आहेत़ तर उर्वरित तीन नमुन्यांच्या अहवालाची अद्याप प्रतिक्षा आहे़ तत्पूर्वी सोमवारी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्याकडून होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांची माहिती घेण्यात आली होती़ यातील केवळ परदेशातून आलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षात पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ यांतर्गत आतापर्यंत पाच जण वसतीगृहात तयार केलेल्या कक्षात दाखल असून त्यांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती आहे़ अमेरिका आणि युरोपिय देशांमधून आलेल्या या नागरिकांना केवळ निगराणीखाली ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे़ त्यांची योग्य काळजी घेतली जात असल्याची माहिती आहे़ आरोग्य विभागाने शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव आणि नवापुर येथे वसतीगृह, आश्रमशाळा आणि ग्रामीण रुग्णालयात विशेष कक्षांची स्थापना केली असून हे कक्ष उपचारांसाठी सज्ज आहेत़ यापैकी केवळ नंदुरबार येथील कक्षातच पाच जणांना ठेवण्यात आले असल्याची माहिती आहे़ देशाबाहेरुन येणारे बरेच जण स्वत:हून जिल्हा रुग्णालयात तपासणी करुन घेत असल्याने अडचणी दूर होत आहेत़प्रशासनानेही खबरदारी म्हणून ग्रामीण भागात परतणाऱ्या भूमिपूत्रांची माहिती देण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि पोलीस पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे़ तालुकास्तरावरील अधिकारी सातत्याने परदेशातून येणाऱ्यांचा आढावा घेत आहेत़