शहाद्यात चाऱ्याच्या गाठींना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 12:53 IST2020-04-05T12:53:02+5:302020-04-05T12:53:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पपई वाहतूक करण्यासाठी वापरासाठी ठेवलेल्या चाºयाच्या गाठींना आग लागून व्यापाºयाचे सुमारे दोन लाखाचे नुकसान ...

शहाद्यात चाऱ्याच्या गाठींना आग
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पपई वाहतूक करण्यासाठी वापरासाठी ठेवलेल्या चाºयाच्या गाठींना आग लागून व्यापाºयाचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. शनिवारी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास प्रकाशा रस्त्यावरील हॉटेल नंदनवनमागील मोकळ्या जागेत घडली. परिसरातील नागरिक व पालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
शेतकऱ्यांकडून पपई खरेदीसाठी अनेक व्यापारी शहरात दाखल झाले आहेत. शहरातील रफिक कासम बागवान हे पपईची खरेदी-विक्री करतात. शहरातील प्रकाशा रस्त्यावर नंदनवन हॉटेलमागे असलेल्या मोकळ्या जागेत बागवान यांचा भाताच्या पेंडीचा (चारा) ढीग होता. शनिवारी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास सूर्याच्या प्रखर उष्णतेने कोरड्या चाºयाला आग लागली. त्यात सुमारे १६० गाठींचे नुकसान झाले. एक गाठ सुमारे अकराशे रुपये खर्चून राजकोट (गुजरात) येथून मागवली जाते. बागवान यांनी सुमारे दोन गाडी म्हणजेच १६० गाठी मागवून मोकळ्या जागेत ठेवल्या होत्या. पपईच्या तोडणीनंतर गाडीत वाहतुकीसाठी कोरड्या भाताच्या पेंडीचा वापर केला जातो. त्यामुळे पपई खराब होत नाही व पिकण्यास मदत होते. या उद्देशाने त्याचा वापर करतात. या मैदानाजवळ राहणारे पत्रकार सल्लाउद्दीन लोहार यांच्या निदर्शनास आग आली. त्यांनी लगेच परिसरातील नागरिकांना सांगितली. जमालुद्दीन लोहार, रफिक बागवान यांनी लागलीच आपल्या बोरवेल्स सुरू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही क्षणातच शहादा पालिकेचा अग्निशमन बंब दाखल झाल्याने आग आटोक्यात आली.
दरम्यान, परिसरात मोटार गॅरेज असल्याने अनेक वाहने दुरुस्तीसाठी येतात. त्यामुळे याच मोकळ्या जागेत वाहनांच्या रांगा लागतात. परंतु सध्या लॉकडाऊन असल्याने सर्वत्र शुकशुकाट असल्याने मोठा अनर्थ टळला.