बिबट्याच्या वास्तव्याने शेतमजुरांमध्ये भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:27 IST2020-06-19T12:23:37+5:302020-06-19T12:27:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : वैजाली रस्त्यावर प्रकाशा येथील शेतकऱ्यांची शेती आहे. या शेतांमध्ये बिबट्याचा वावर असून त्याचे पायाचे ...

बिबट्याच्या वास्तव्याने शेतमजुरांमध्ये भीती
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : वैजाली रस्त्यावर प्रकाशा येथील शेतकऱ्यांची शेती आहे. या शेतांमध्ये बिबट्याचा वावर असून त्याचे पायाचे ठसे आढळून आल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा शोध घेऊन भीतीचे वातावरण दूर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा-वैजाली रस्त्यावर गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर गावातील देवेंद्र वसंत पाटील यांच्या शेताजवळ बंद पडलेल्या उपसा जलसिंचन योजनेची जुनी पाण्याची टाकी व इमारत आहे. त्याठिकाणी बिबट्याचे वास्तव्य असल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी सकाळी बिबट्याच्या पायाचे ठसे शेतात दिसून आले. परशराम सदाशिव पाटील, अशोक सुदाम पाटील, रमणलाल परशराम पाटील, रमेश पाटील, सुनील संभू पाटील, देवेंद्र वसंत पाटील आदी शेतकºयांच्या शेतात बिबट्याचा वावर असल्याचे सांगण्यात आले. सुनील संभू पाटील यांच्या पेरणी न केलेल्या शेतामध्ये या बिबट्याचे पायाचे ठसे स्पष्ट दिसून आले. याठिकाणी बंद पडलेल्या उपसा जलसिंचन योजनेच्या पडक्या अवस्थेत पाण्याची टाकी, रखवालदाराची खोली आहे. त्याठिकाणी काटेरी झाडे आहेत. म्हणून त्याठिकाणी बिबट्याचे वास्तव्य आहे. तसेच जवळच बांबूचे शेत आहे त्या शेतामध्ये त्याचा वावर असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. वनविभागाने येथे भेट देऊन बिबट्याच्या पायाचे ठसे पाहून त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. कारण आता शेतीच्या कामांना वेग आला आहे. पेरणी व लागवड केलेल्या पिकांची आंतरमशागतीचे काम करणे गरजेचे आहे. मात्र बिबट्याचा वावर असल्याने भीतीमुळे मजूर काम करण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रकाशा शेतकरी संघटनेकडून केली जात आहे.
गेल्या महिन्यात तळोदा तालुक्यात हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एका शेतकºयाला जीव गमवावा लागला तर तीन जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे शेतमजुरांमध्ये हिंस्त्र प्राण्यांबद्दल प्रचंड भीती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम शेतीकामांवर होऊन वेळेवर पिकांची मशागत न झाल्यास उत्पन्नातही घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.