शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

वीज दुरुस्ती कामांमुळे दोन तालुक्यातील शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 1:54 PM

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात वीज कंपनीकडून वेळोवेळी वीज दुरुस्तीची कामे सुरु करण्यात येत असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात वीज कंपनीकडून वेळोवेळी वीज दुरुस्तीची कामे सुरु करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यास अडचणी येत आहेत़ शनिवारी रात्री वीज पुरवठाच न झाल्याने शेतकऱ्यांचे हाल झाल्याचे समोर आले आहे़ विशेष म्हणजे दुरुस्ती होणार असल्याचे कंपनीकडून शेतकºयांना न कळवताच २४ तास वीज पुरवठा खंडीत होता़वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागांतर्गत शहादा, तळोदा, धडगाव आणि अक्कलकुवा या चार तालुक्यात १३२ किलो व्हॅट दर्जाच्या वीजवाहिनीतून वीज पुरवठा करण्यात येतो़ शेतशिवारात तब्बल २७ हजार ५०० ग्राहकांना ह्या विजेचा पुरवठा करण्यात येतो़ यात तळोदा आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यांची १३२ के़व्ही लाईन सातत्याने नादुरुस्त होत असल्याचे प्रकार सुरु असल्याने शेतकºयांना त्याचा भुर्दंड बसत असल्याचे समोर येत आहे़ वीजपुरवठा होत नसल्याने शेतकºयांना गहू आणि हरभरा या पिकांना पाणी देणे शक्यच होत नसल्याने पिके धोक्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़ बºयाचवेळा रात्री उशीरा होणारा विज पुरवठा निर्धारित वेळेपेक्षाही कमी वेळ सुरु राहत असल्याने पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़ तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील उपकेंंद्रांत योग्य त्या सुविधा नसल्याने ही स्थिती निर्माण झाली असल्याने कंपनीने शेतकºयांच्या हंगामापुरते तरी योग्य तेवढा वेळ सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे़शनिवारी झालेल्या प्रकारानंतर दोन्ही तालुक्यातील शेतकरी रात्रभर विजेच्या प्रतिक्षेत बसून असल्याचे सांगण्यात येत आहे़ कंपनीने न सांगता वीज पुरवठा बंद केल्याने अनेकांनी संताप व्यक्त करत कंपनीच्या अधिकाºयांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता़ परंतू संपर्क होऊ शकला नसल्याची माहिती आहे़तळोदा आणि अक्कलकुवा या दोन्ही तालुक्यात सातपुड्याचा समावेश आहे़ तळोदा तालुक्यात सातपुड्याचा पायथ्याशी असलेले शेतकरी तसेच दुर्गम भागातील शेतकरी रब्बी हंगामात वीजेच्या भरवशाने पाणी पुरवठा करतात़ परंतू कंपनीकडून मात्र वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होत आहे़ तळोदा तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोरवड येथे वीज उपकेंद्र मंजूर करण्यात आले होते़ परंतू हे उपकेंद्र अद्याप पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आलेले नाही़ परिणामी बोरद, प्रतापपूर आणि अक्कलकुवा येथील उपकेंद्रांमध्ये वीज पुरवठ्याबाबत अडचणी येत आहेत़ वेळोवेळी बंद पडणारे ट्रान्सफार्मर्स, तुटणाºया विज वाहिन्या यांची जोडणी करण्यासाठी वीज पुरवठा बंद करावा लागत असल्याने शेतपिकांना अडचणी येत आहेत़ हंगाम आटोपण्यावर आला असताना वीजेची निर्माण होणारी समस्या निकाली न निघाल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत़