भुसार मालाची शासकीय खरेदी नसल्याने शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST2021-05-21T04:31:41+5:302021-05-21T04:31:41+5:30
शहादा तालुका खरेदी-विक्री सहकारी संघात ३० एप्रिलपर्यंत शेकडो शेतकऱ्यांनी नाव नोंदवली गेली आहेत. त्यांची धान्य खरेदी झाली नाही व ...

भुसार मालाची शासकीय खरेदी नसल्याने शेतकरी अडचणीत
शहादा तालुका खरेदी-विक्री सहकारी संघात ३० एप्रिलपर्यंत शेकडो शेतकऱ्यांनी नाव नोंदवली गेली आहेत. त्यांची धान्य खरेदी झाली नाही व ज्यांचे नाव नोंदणी बाकी आहे ते तर या प्रक्रिये पासून खूपच लांब आहेत. त्यामुळे प्रक्रियेला गती देऊन प्रत्यक्ष खरेदी करण्यात यावी. रब्बी ज्वारी (दादर)चे उत्पन्न आलेल्या शेतकऱ्यांची व्यथा अशी आहे की, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ज्वारीला भाव फारच कमी आहे. शासकिय किंमत दोन हजार ६०० रुपये प्रती क्विटंल जाहीर केली आहे. परंतु खरेदी बंद आहे, त्याचा फायदा घेत खाजगी व्यापारी खेडा पद्धतीने एक हजार ६०० ते एक हजार ७०० रुपये भावाने ज्वारी खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच काही शेतकऱ्यांना माल भरण्यासाठी स्वतःचे गोडाऊन नसल्यामुळे मिळेल त्या भावाने माल विकावा लागत आहे. तरी शासकीय भुसार धान्य खरेदी केंद्रामार्फत पावसाळ्याआधी शासकीय खरेदी सुरु झाली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. रब्बी ज्वारी, मका, बाजरी आदींची खरेदी तातडीने करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शहादा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघात जाऊन तीन महिन्यापूर्वी शासकीय भुसार माल खरेदी योजनेत नाव नोंदणी केली आहे. परंतु अद्यापपोवेतो शासकीय खरेदी कुठलीही हालचाल शासन स्तरावरून दिसत नाही. पावसाळ्याच्या आधी खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे. याकामी शहादा तहसीलदारांनी त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात.
-हरी दत्तू पाटील, भाजप पदाधिकारी व शेतकरी, प्रकाशा
लोकमत न्यूज नेटवर्क. तळोदा, तालुक्यातील रेवानगर ग्राम पंचायतीच्या मासिक सभेत बाहेरील व्यक्ती बेकायदेशीर पने उपस्थित राहून कामकाजात हस्तक्षेप करतात. याला सरपंच व ग्रामसेवक देखील जबाबदार असून या उलट विरोधी ग्राम पंचायत सदस्या स अपमानास्पद वागणूक देतात त्यामुळे बाहेरील हस्तक्षेप थांबविण्याची मागणी पंचायत समिती सदस्य,ग्राम पंचायत सदस्यांनी केली आहे.अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील रेवनगार ग्रांचांचायातीच्या सत्ते बाहेरील जास्तीच्या हस्तक्षेप बाबत पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा व ग्राम पंचायत सदस्य तेहरसिंग पावरा यांनी तहसीलदार गिरीश वाखारे यांचा कडे लेखी तक्रार केली आहे.त्यात म्हटले आहे की,ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सदस्यांना न बसवता सर्ते बाहेरील कार्यकर्त्यांना बसवितात.एवढेच नव्हे कामकाजात भाग घेवून ढवळाढवळ देखील करतात.शिवाय बेकायदेशीर कामे करण्यास भाग पडतात.याचे सरपंच व ग्रामसेवक अवलोकन करीत नाही म्हणजेच त्यांची एकप्रकारे मुक समतीच आहे.विविध विषयांवर हेच व्यक्ती मध्यस्थी करतात. दि १८ मे चया पार पडलेल्या सभेत ग्राम पंचायत सदस्य तेहरासिंग यांनी आपल्या प्रभागातील विविध समस्या व अडचणी लेखी स्वरूपात सादर केल्या होत्या. परंतू सदस्य नसलेले चीमा पावरा, नाथ्या पावरा, डेमशा पावरा यांनी त्याची खिल्ली उडविली.तुम्ही कितीही अर्ज द्या,तुमचे कामे होवू देणार नाहीत असे म्हणून अपमानास्पद वागणूक दिली होती.यावर सरपंचाने काहीच दखल घेतली नाही.असा आरोप त्यांनी केला आहे. कोरोना बाबत गावातील लोकांमध्य नकारात्मकता आहे.त्यावर जनजागृती केली जात नाही.शिवाय गावातील बहुसंख्य हात पंप नादुरुस्त झाले आहे.त्यामुळे पाणी टंचाई देखील निर्माण झाली आहे.महामारी मुळे ग्राम सभा झालेली नाही.मागील चार पाच महिन्यात मासिक सभा झालेल्या आहेत.त्या सभांमध्ये सदस्य नसलेल्यांना बसविण्यात येत आहे. अशा बेकायदेशीर प्रकाराला कायम स्वरुपी आळा घालावा. अशी मागणी पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा,टेहरसिंग पावरा,पिंटू पावरा,दुरशा पावरा,बारक्या पावरा, लेहाऱ्या पावरा,मिनेश पावरा,रुमाल्या पावरा यांनी केली आहे.
फोटो,तहसीलदार वाखारे याना निवेदन देताना डाज्या पावरा,तहरसिंग पावरा,पिंटू पावरा