शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांचे रेल्वेरोको आंदोलन टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 11:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विविध मागण्यांसाठी रेल्वे रोको आंदोलनाकरीता स्थानकात आगेकूच करणा:या प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्र्याना पोलिसांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विविध मागण्यांसाठी रेल्वे रोको आंदोलनाकरीता स्थानकात आगेकूच करणा:या प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्र्याना पोलिसांनी रोखल्याने गोंधळ उडाला. यावेळी संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनासाठी स्थानकात प्रवेश करू देण्याची मागणी केली. आंदोलक व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्यानंतर तहसीलदार भाऊसाहेब थोरात आंदोलन स्थळी दाखल झाले. लेखी आश्वासन दिल्याने आंदोलक माघारी परतले.आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने शेतक:यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिका:यांना निवेदन सादर करण्यात आले होते. परंतु अपेक्षित निर्णय होऊ न शकल्यामुळे पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता.गुरुवार 6 जून रोजी संघटनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी 10 वाजता रेल्वे स्थानक परिसरात एकत्र आल्यानंतर 11 वाजेच्या सुमारास रेल्वेरोको साठी स्टेशन च्या आत जाण्यासाठी निघाले मात्र, पूवीर्पासून बंदोबस्तावर असलेल्या रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस ठाणे तसेच शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्यांना रोखले.पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यानंतर रेल्वे रोको साठी स्थानकात जाऊ देण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये काही काळ शाब्दिक चकमकही झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार, सहाय्यक सुरक्षा आयुक्त राकेश पांडे यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रय} केला.परंतु आंदोलक समजण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेतकरी मागण्यांवर ठाम होते. महसूल प्रशासनातील अधिका:यांना चर्चेसाठी बोलावण्याची मागणी लावून धरली त्यानुसार तहसीलदार भाऊसाहेब थोरात आंदोलन स्थळी दाखल झाले.आंदोलकांशीे चर्चातहसीलदार थोरात यांनी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील व पदाधिकारी, कार्यकत्र्यांशी चर्चा केली. शासनाने दुष्काळ जाहीर करूनही दुष्काळ निधी अत्यल्प असल्यामुळे  जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगारांची चेष्टा झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.  16 जूनला बैठकतहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत. संबंधित अधिका:यांशी  चर्चा करून तोडगा काढण्यात येणार असल्याचे लेखी पत्र आंदोलकांना दिले. त्यानंतर आंदोलक माघारी परतले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील, गजानन वसावे, सुनील पाटील, रघुनाथ पाटील, महादेव पाटील, महेंद्र बोरसे ,सचिन महाले, योगेश बोरसे, प्रमोद पाटील, राजेंद्र सैंदाणे, सुदाम वरसाडे, रमेश पाटील,  उदयसिंह राजपूत,  वेडू पाटील, संजय पाटील, किशोर पाटील, रोत्या पाडवी, रवींद्र वळवी आदींसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. प्रत्येक शेतक:याला कर्जमाफीचा लाभ मिळावा. खरीप व रब्बी हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे. सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज पुरवठ्याची अंमलबजावणी तातडीने करावी.4चारा छावण्या तात्काळ सुरु कराव्यात. कांदा उत्पादक शेतक:यांना अनुदाना पासून वंचित ठेवणा:यांवर  कारवाई करावी.प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची पूर्वकल्पना असल्यामुळे लोहमार्ग पोलीस स्टेशन, रेल्वे सुरक्षा बल व शहर पोलिसांच्या पथकाने सकाळपासूनच फौजफाटा तैनात केला होता. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ व मागील बाजूस तसेच ठिकठिकाणी पोलीस मोठ्या संख्येने तैनात होते. यामुळे रेल्वे प्रवासी आणि परिसरातील व्यवसायिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते.