ठरलेल्या दराप्रमाणेच शेतकऱ्यांनी पपई तोड करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:58 IST2020-02-14T12:57:54+5:302020-02-14T12:58:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, व्यापारी व बाजार समितीने पपई दरवाढीसाठी बोलावलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी ...

The farmers should break the papaya at the fixed rate | ठरलेल्या दराप्रमाणेच शेतकऱ्यांनी पपई तोड करावी

ठरलेल्या दराप्रमाणेच शेतकऱ्यांनी पपई तोड करावी

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, व्यापारी व बाजार समितीने पपई दरवाढीसाठी बोलावलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी एकजुटीने विरोध दर्शवत दरवाढीला अर्जाद्वारे विरोध दर्शविला होता. त्यावर शेतकºयांचे नुकसान होऊ नये म्हणून बाजार समितीने पुढाकार घेत गुरुवारी पुन्हा बैठक घेण्यात आली. त्यात १४ रुपये ५५ पैसे दर ठरवण्यात आला असून १४ फेब्रुवारीपासून या दराने पपईची तोडणी करावी, असे आवाहन पपई उत्पादक संघर्ष समितीतर्फे करण्यात आले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पपईच्या दराचा तिडा सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीला बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी, रवींद्र रावल, पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, विश्वनाथ पाटील, उमेश पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील, अनिल पाटील, राजू पिंजारी, जयप्रकाश पाटील, हिलाल माळी, भरत पाटील आदींसह शेतकरी व शेख हाजी नाजिम, हाजी सरताज, हाजी इकबाल, प्रकाशभाई राजस्थानवाले, राहुलभाई राजस्थानवाले, हाजी अहमद हाजी नाजीम आदी व्यापारी उपस्थित होते. पपईच्या दरवाढीसंदर्भात व्यापारी व संघर्ष समितीत चर्चा झाली. पपई उत्पादक संघर्ष समितीने सुरुवातीला व्यापाºयांशी चर्चा करताना १६ रुपये दर ठेवला. तो दर परवडत नसल्याने व्यापाºयांनी अमान्य केला. त्यानंतर सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी यांनी हस्तक्षेप करत व्यापाºयांना तिढा सोडवण्यास सांगितला. शेतकरी, संघर्ष समिती व व्यापारी यांची रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरुच होती.
पपई हे नाशवंत पीक असल्याने आजपर्यंत शेतकरी घाबरून पपईची तोड सुरु राहू देत होते. परंतु बुधवारी भाववाढीसाठी बोलावलेल्या बैठकीला व्यापाºयांनी एकजूट दाखवत विरोध दर्शवला होता. त्यामुळे संघर्ष समितीनेही सर्व शेतकºयांना एकत्रित येण्याचे आवाहन करून पपई तोड बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सर्व शेतकºयांनी पपई तोड बंद केल्याने शेतकºयांची एकजूट पाहून व्यापारीही नरमले. बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी पुढाकार घेऊन तिढा सोडवण्यासाठी व्यापारी व शेतकºयांना आमंत्रित केले. त्यानुसार व्यापाºयांनी होकार देत गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत शेतकºयांनी सांगितलेला भाव व्यापाºयांनी अमान्य केल्याने शेतकºयांनी बैठक संपवली. परंतु व्यापारी बसूनच होते. यावरून उत्तर भारतात पपईला दर जास्त मिळत असल्याने त्यामुळेच व्यापारी बैठक सोडून जात नव्हते. अखेर व्यापाºयांनी १४ रुपये ५५पैसे दर मान्य केला.

Web Title: The farmers should break the papaya at the fixed rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.