शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या आदिवासींमध्ये नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 11:59 IST

जनजाती चेतना परिषद : समाजाचे धैर्य विषयावर केंद्रीय जनजाती आयोग अध्यक्षांचे मत

नंदुरबार : जनजाती समाजात धैर्य ठासून भरलेले आहे. त्यामुळेच आदिवासी समाजात शेतकरी आत्महत्या होत नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी येथे आयोजित जनजाती चेतना परिषदेत बोलतांना केले.देवगिरी कल्याण आश्रमातर्फे रविवारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात जनजाती चेतना परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. परिषदेची सुरुवात दिनदयाल चौकातून निघालेल्या रॅलीने झाली.  परिषदेत जनजाती बांधवांच्या विविध समस्यांवर विचारविनिमय करण्यात आले.यावेळी मंचावर केंद्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय, भारतीय नौसेना आयुध सेवेतील लक्ष्मणराजसिंह मरकाम, अखिल भारतीय कल्याण आश्रमाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा नीलिमा पट्टे, सोलापूर येथील प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, नाशिक पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत सचिव प्रा.शरद शेळके, विशाखापट्टणम येथील आयएएस अधिकारी शंकरसिंह, जनजाती मंचचे अध्यक्ष डॉ. राजकिशोर हलया,  खासदार डॉ. हिना गावीत, आयोजन समिती अध्यक्ष डॉ.प्रकाश ठाकरे, आमदार उदेसिंग पाडवी, वनवासी कल्याण आश्रमाचे प्रांताध्यक्ष चैत्राम पवार, प्रांत सहसचिव मोवल्या गावीत, गणेश गावीत, प्रा.पुष्पा गावीत, डॉ.विरेंन्द्र वळवी उपस्थित होते.यावेळी बोलतांना नंदकुमार साय म्हणाले, आजच्या युगात मणुष्य धैर्य ठेवत नसल्याने अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यात जनजाती समाजाचे लोक दिसणार नाहीत. धैर्य धर्माचे पहिले लक्षण आहे. प्रत्येक व्यक्तीत धैर्य ठासून भरलेले पाहिजे. समाजाला शिक्षित कसे केले जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आदिवासी भागात शिक्षणाची काय परिस्थिती आहे याची माहिती मी घेत असतो. खेळामध्ये जर पदक मिळवायचे असतील तर या समाजाला पुढे आणले पाहिजे. सध्या देशापुढे राष्ट्रीय चारित्र्य हा मोठा प्रश्न आहे.  जनजाती समाज हा राष्ट्राबरोबर कधीच धोका करू शकत नाही. देशात मुलींची भ्रृणहत्या मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. परंतु आदिवासी समाजात असे प्रकार कधीच होणार नाहीत. महिलांविषयी जनजाती समाजाने व एकुणच देशाने कधीच तडजोड केली नाही. विविध जनजातींच्या सर्वागीण प्रगतीसाठी आयोग काम करत असल्याचेही नंदकुमार साय यांनी सांगितले.भारतीय नौसेना आयुध सेवेचे अधिकारी लक्ष्मणराजसिंह मरकाम यांनी सांगितले, पाचवी अनुसूची ही संविधानाचा हिस्सा आहे. राज्यात 47 प्रकारच्या जनजाती आहेत. 11 टक्के जनजाती एकटय़ा महाराष्ट्रात आहेत. वनांमध्ये वास्तव्य करणा:या जनजातींची संख्या अधीक आहे. धरणांच्या क्षेत्रातील 60 टक्के जमीनींवर जनजाती समाज वास्तव्यास होता. त्यातून तो विस्थापीत झाला. परिणामी देशाच्या विकासात या समाजाचे मोठे स्थान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.चैत्राम पवार यांनी सांगितले, समाजाच्या सर्वागिन विकासासाठी काय करता येईल याचा विचार वनवासी कल्याण आश्रमातर्फे केला जातो. धुळे जिल्ह्यात दहा गावांना सामुदायीक वनाधिकार मिळाले असून 14 गावांचे प्रस्ताव पाठविले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातही प्रय} सुरू आहेत. जंगल, जल, जमीन, जन, गोधन हे आपल्या विकासाला आवश्यक असून ते आपल्याजवळ उपलब्ध आहे. सामुदायीक वनाधिकाराचा हक्क मिळण्यासाठी ग्राम संघटीत करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.परिषदेत चार सत्रात विविध उपक्रम घेण्यात आले. सूत्रसंचलन अशोक पाडवी यांनी केले. प्रास्ताविक डॉ.विशाल वळवी यांनी केले. आभार विरेंद्र वळवी यांनी मानले.