शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या आदिवासींमध्ये नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 11:59 IST

जनजाती चेतना परिषद : समाजाचे धैर्य विषयावर केंद्रीय जनजाती आयोग अध्यक्षांचे मत

नंदुरबार : जनजाती समाजात धैर्य ठासून भरलेले आहे. त्यामुळेच आदिवासी समाजात शेतकरी आत्महत्या होत नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी येथे आयोजित जनजाती चेतना परिषदेत बोलतांना केले.देवगिरी कल्याण आश्रमातर्फे रविवारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात जनजाती चेतना परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. परिषदेची सुरुवात दिनदयाल चौकातून निघालेल्या रॅलीने झाली.  परिषदेत जनजाती बांधवांच्या विविध समस्यांवर विचारविनिमय करण्यात आले.यावेळी मंचावर केंद्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय, भारतीय नौसेना आयुध सेवेतील लक्ष्मणराजसिंह मरकाम, अखिल भारतीय कल्याण आश्रमाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा नीलिमा पट्टे, सोलापूर येथील प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, नाशिक पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत सचिव प्रा.शरद शेळके, विशाखापट्टणम येथील आयएएस अधिकारी शंकरसिंह, जनजाती मंचचे अध्यक्ष डॉ. राजकिशोर हलया,  खासदार डॉ. हिना गावीत, आयोजन समिती अध्यक्ष डॉ.प्रकाश ठाकरे, आमदार उदेसिंग पाडवी, वनवासी कल्याण आश्रमाचे प्रांताध्यक्ष चैत्राम पवार, प्रांत सहसचिव मोवल्या गावीत, गणेश गावीत, प्रा.पुष्पा गावीत, डॉ.विरेंन्द्र वळवी उपस्थित होते.यावेळी बोलतांना नंदकुमार साय म्हणाले, आजच्या युगात मणुष्य धैर्य ठेवत नसल्याने अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यात जनजाती समाजाचे लोक दिसणार नाहीत. धैर्य धर्माचे पहिले लक्षण आहे. प्रत्येक व्यक्तीत धैर्य ठासून भरलेले पाहिजे. समाजाला शिक्षित कसे केले जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आदिवासी भागात शिक्षणाची काय परिस्थिती आहे याची माहिती मी घेत असतो. खेळामध्ये जर पदक मिळवायचे असतील तर या समाजाला पुढे आणले पाहिजे. सध्या देशापुढे राष्ट्रीय चारित्र्य हा मोठा प्रश्न आहे.  जनजाती समाज हा राष्ट्राबरोबर कधीच धोका करू शकत नाही. देशात मुलींची भ्रृणहत्या मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. परंतु आदिवासी समाजात असे प्रकार कधीच होणार नाहीत. महिलांविषयी जनजाती समाजाने व एकुणच देशाने कधीच तडजोड केली नाही. विविध जनजातींच्या सर्वागीण प्रगतीसाठी आयोग काम करत असल्याचेही नंदकुमार साय यांनी सांगितले.भारतीय नौसेना आयुध सेवेचे अधिकारी लक्ष्मणराजसिंह मरकाम यांनी सांगितले, पाचवी अनुसूची ही संविधानाचा हिस्सा आहे. राज्यात 47 प्रकारच्या जनजाती आहेत. 11 टक्के जनजाती एकटय़ा महाराष्ट्रात आहेत. वनांमध्ये वास्तव्य करणा:या जनजातींची संख्या अधीक आहे. धरणांच्या क्षेत्रातील 60 टक्के जमीनींवर जनजाती समाज वास्तव्यास होता. त्यातून तो विस्थापीत झाला. परिणामी देशाच्या विकासात या समाजाचे मोठे स्थान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.चैत्राम पवार यांनी सांगितले, समाजाच्या सर्वागिन विकासासाठी काय करता येईल याचा विचार वनवासी कल्याण आश्रमातर्फे केला जातो. धुळे जिल्ह्यात दहा गावांना सामुदायीक वनाधिकार मिळाले असून 14 गावांचे प्रस्ताव पाठविले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातही प्रय} सुरू आहेत. जंगल, जल, जमीन, जन, गोधन हे आपल्या विकासाला आवश्यक असून ते आपल्याजवळ उपलब्ध आहे. सामुदायीक वनाधिकाराचा हक्क मिळण्यासाठी ग्राम संघटीत करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.परिषदेत चार सत्रात विविध उपक्रम घेण्यात आले. सूत्रसंचलन अशोक पाडवी यांनी केले. प्रास्ताविक डॉ.विशाल वळवी यांनी केले. आभार विरेंद्र वळवी यांनी मानले.