भाजीपाला लिलाव पूर्ववत करण्याची शेतकऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST2021-02-05T08:06:52+5:302021-02-05T08:06:52+5:30
सातपुड्यातील दुर्गम भागात अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्हा भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला आणण्यासाठी रात्री दोन वाजता वाहतूक व्यवस्था ...

भाजीपाला लिलाव पूर्ववत करण्याची शेतकऱ्यांची मागणी
सातपुड्यातील दुर्गम भागात अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्हा भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला आणण्यासाठी रात्री दोन वाजता वाहतूक व्यवस्था उपलब्ध होत नसल्याने वाहतुकीअभावी भाजीपाला पिकांचे नुकसान होत आहे. खासगी वाहनधारकांकडून रात्रीची वाहतुकीसाठी जास्तीची भाडे आकारणी होत असून त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला मार्केटला आणणे जिकिरीचे जात असून मार्केट कमिटीने शेतकऱ्यांच्या समस्येचे गंभीर दखल घेऊन भाजीपाला लिलाव पूर्ववत सकाळी व दुपारी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यामध्ये व्यक्त करण्यात येत आहे.
मार्केटमध्ये भाजीपाला आणण्यासाठी वाहन मिळत नसल्याने शेतात पडून असलेला भाजीपाला.
रात्री दोन वाजेच्या वेळेत शेतकऱ्यांना मार्केटच्या ठरलेल्या वेळेत भाजीपाला विक्रीस आणण्याची मुभा असून रात्री खासगी वाहनाने भाजीपाला मार्केटला आणण्याकरिता जिकिरीचे जात आहे. खासगी वाहनधारकांकडून अतिरिक्त भाडे वसूल करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.
-रमेश वळवी,भाजीपाला उत्पादक शेतकरी
शेतकऱ्यांना भाजीपाला आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होत नसल्याने भाजीपाला खराब होत आहे. भाजीपाला मार्केट कमिटीने लिलाव सकाळी ५वाजता व दुपारी दोन वाजेपासून सुरू केले तर शेतकऱ्यांना भाजीपाला मार्केटला सकाळी किंवा दुपारी आणता येईल.
-संजय पाटील,भाजीपाला उत्पादक शेतकरी