शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

एरंडीवर अळ्यांच्या प्रादुर्भावाने शेतकरी चिंतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 15:55 IST

सोमावल परिसर : उत्पन्नात घट होणार, कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज

सोमावल : तळोदा तालुक्यातील सोमावल परिसरात एरंडीचे पीक काढणीवर आले असून अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा प्रभाव झपाटय़ाने वाढत असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त होत आहे.परिसरात मागील काही वर्षापासून बहुतेक शेतकरी एरंडीचे उत्पादन घेत आहेत. येथील शेतकरी भौगोलिक परिस्थितीची जाणीव ठेवत ज्या पिकाला मागणी आहे त्याच पिकाची लागवड करण्यावर भर देतात. एरंडीला तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या गुजरात राज्यात मोठी मागणी असते. त्यामुळे याठिकाणी या पिकाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परिसरातील काही प्रयोगशील शेतक:यांनी मागीलवर्षी लागवड केलेल्या एरंडी पिकाच्या झाडावरील आजूबाजू वाढलेल्या  फक्त फांद्या तोडून पीक तसेच राखून ठेवले. परिणामी कमी खर्चात  पिकाची जोमदार वाढ होऊन मागील वर्षाच्या निघालेल्या उत्पादनाच्या तुलनेत यंदा सुरवातीपासूनच         पहिल्या वर्षापेक्षा जास्त प्रमाणात लागलेली एरंडी यामुळे उत्पादनात तीन ते चार पट वाढ होण्याची  शक्यता आहे. परिपक्व पिकांची आतापासूनच काढणी सुरु             झाल्याने प्रयोगशील शेतकरी आनंदात आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून या पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक:यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पिकावर अळ्यांच्या अचानक झालेल्या आक्रमणामुळे शेतकरी  पुरता हवालदिल झाला आहे. परिसरात सर्वाधिक पीक एरंडीचे घेतले जात असल्याने अळ्यांमुळे  मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या अळ्यांचे पिकाच्या पानांवरच आक्रमण होत आहे. अळ्या संपूर्ण पान हळूहळू खाऊन टाकत असल्याने पीक निरूपयोगी ठरत आहे. विशेषता पानाच्या पृष्ठभागावर या अळ्यांचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पिकाची पाने कोरडी पडत असून ऐन वाढीच्या व फळधारणेच्यावेळी अशाप्रकारे अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. याबाबत शेतक:यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.