शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 12:04 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्याप्रमाणेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी या तिन्ही पक्षांची ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्याप्रमाणेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा असली तरी नंदुरबार जिल्ह्यात मात्र हा प्रयोग पुरता फसला आहे. तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत असून अनेक गट आणि गणात याच पक्षांमध्ये प्रमुख लढत होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, तब्बल डझनभर नेत्यांचे वारसदार या निवडणुकीत भवितव्य अजमावीत असून त्यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेचे ५६ गट व जिल्ह्यातील सहा पंचायत समितींच्या ११२ गणांसाठी येत्या ७ जानेवारीला मतदान होणार आहे. माघारीनंतर सर्वच गट आणि गणातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी या निवडणुकीतही राज्याप्रमाणेच महाविकास आघाडी स्थापन करून काँग्रेस, शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढविण्याची चर्चा सुरू झाली होती. त्या संदर्भात या तिन्ही पक्षातील नेत्यांची मुंबईतही बैठक झाली होती. मात्र स्थानिक राजकारण आणि सर्वच पक्षातील इच्छूक उमेदवारांची मनधरणी करण्यात नेत्यांनाही अवघड झाल्याने महाविकास आघाडी न होता तिन्ही पक्षांतर्फे स्वतंत्र निवडणूक लढविण्यात येत आहे. जिल्ह्यातील राजकीय स्थिती पहाता या जिल्हा परिषदेत पूर्वी काँग्रेसची सत्ता होती. तर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्टÑवादी होती. शिवसेना आणि भाजपचे फारसे अस्तित्व नव्हते. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याने राजकीय समिकरण पुरते बदलले आहे. निवडणुकीत भाजपने सर्व ठिकाणी उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पाठोपाठ काँग्रेसनेही बहुतांश सर्वच ठिकाणी उमेदवार दिले आहेत. पण शिवसेना आणि राष्टÑवादीला मात्र सर्वच ठिकाणी उमेदवार देणे शक्य झालेले नाही. राष्टÑवादीने एकुण ५६ पैकी १४ गटात तर ११२ गणापैकी ११ गणात अधिकृत उमेदवार दिले आहेत. याशिवाय १४ अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केले आहे. शिवसेनेला देखील अनेक ठिकाणी उमेदवार देता आलेले नाही. अशा स्थितीत निवडणुकीत कुण्या एका पक्षाची सत्ता येईल अशी स्थिती आजतरी दिसून येत नाही.या निवडणुकीचे वैशिष्टये म्हणजे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करणारे भाजपचे भरत गावीत व भाजपतीलच बंडखोर उमेदवार नागेश पाडवी हे दोन्ही भाजपतर्फे जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवित आहेत. बहुतांश नेत्यांचे वारसदार देखील आपले भाग्य अजमावीत आहेत. त्यात ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे पूत्र अजीत नाईक व दीपक नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या पत्नी डॉ. कुमुदिनी गावीत, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पूत्र अ‍ॅड. राम रघुवंशी, माजी आमदार शरद गावीत यांच्या कन्या अर्चना व राजश्री गावीत, माजी आमदार अ‍ॅड.पद्माकर वळवी यांची कन्या अ‍ॅड.सिमा वळवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतिलाल पाटील यांचे पूत्र अभिजीत पाटील, माजी आमदार डॉ.नरेंद्र पाडवी यांच्या पत्नी आशा पाडवी आदींचा समावेश आहे. नेत्यांच्या वारसदारांचे भवितव्य ठरविणारी असून निवडणुकीनंतर कुणाची पक्षाची युती होईल याची उत्सूकता आहे.सर्वच पक्षातर्फे प्रचाराला जोर आला आहे. भाजपतर्फे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी प्रचारासाठी येत असून त्यांच्या धडगाव आणि बोरद येथे प्रचार सभा आहेत. तर काँग्रेसतर्फे मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांची शुक्रवारीच धडगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक आहे. इतरही नेत्यांच्या बैठक होत आहेत.