३५० हेक्टर केळी बागांच्या नुकसानीचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:35 IST2020-06-15T12:35:25+5:302020-06-15T12:35:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शुक्रवारी आलेल्या वादळी पावसामुळे तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ३५० हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या बागांचे नुकसान झाल्याचा ...

३५० हेक्टर केळी बागांच्या नुकसानीचा अंदाज
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शुक्रवारी आलेल्या वादळी पावसामुळे तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ३५० हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या बागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला असून रविवारपासून कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पंचनाम्यांना सुरुवात केली आहे. असे असले तरी पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रचंड वादळी वाºयासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या वादळामुळे बोरद, खरवड, मोड, खेडले, तºहावद, धानोरा, मोरवड, तळवे, आमलाड या पूर्व भागातील गावांमधील शेतकºयांच्या केळीच्या बागा अक्षरश: उद्ध्वस्त झाल्या आहेत. शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास आसमानी संकटाने हिरावून घेतला आहे. यात शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक अल्पभूधारक शेतकºयांच्या केळीच्या बागाही नष्ट झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय काही पपईच्या बागादेखील आडव्या पडल्या आहेत. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार साधारण ३५० हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचे अधिकाºयांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. तळोदा कृषी कार्यालयाकडून शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही रविवारपासूनच करण्यात आली आहे. पंचनाम्यांची कार्यवाही कृषी विभागाने तात्काळ हाती घेतली असली तरी त्यास गती देण्याची अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.
आमदारांकडून पाहणी
आमदार राजेश पाडवी यांनी शनिवारी उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांच्यासह मोड, बोरद, खरवड, मोरवड, आमलाड या गावांना भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. याशिवाय घरांच्या नुकसानीचीही पाहणी केली. पंचनाम्याचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना आमदार पाडवी यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या आहेत.
बोरद परिसरात
खासदारांकडून पाहणी
तळोदा तालुक्यातील मोड, बोरद, खरवड, तºहावद, खेडले येथे वादळ व पावसामुळे पडझड झालेल्या घरांची व शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी रविवारी खासदार डॉ.हीना गावीत यांनी केली. वादळात ज्यांच्या घरांच्या नुकसान झाले आहे अशा बाधीतांची तात्पुरती सोय जि.प. शाळांमध्ये करण्याची सूचना खासदार डॉ.हीना गावीत यांनी केली. पडझड झालेली घरे व नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी केल्यानंतर संबंधित विभागांना तातडीने पंचनामे पूर्ण करावेत व नुकसानग्रस्तांना मदत मिळवून द्यावी, असे सांगितले. खंडित झालेला वीजपुरवठा त्वरित दुरुस्ती करून सुरळीत करावा व ग्रामपंचातींनी जनरेटर लावून पाणीपुरवठा करण्याची सूचनाही त्यांनी केली. या वेळी पं.स.चे माजी सभापती जितेंद्र पाडवी, तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, बांधकाम विभागाने शाखा अभियंता नितीन वसावे, वीज कंपनीचे सहायक कार्यकारी अभियंता सचिन काळे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, सरपंच जयसिंग माळी, ग्रामविस्तार अधिकारी जाधव, शांतीलाल बावा, मंडळ अधिकारी माया मराठे, तलाठी अरुण धनगर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
या वादळी पावसामुळे मोड, बोरद गावासह सरदार सरोवर प्रकल्पात बाधीत झालेल्या मोड पुनर्वसन, तºहावद, रेवानगर या वसाहतींमधील जवळपास शंभरावर घरांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने या नुकसानग्रस्त घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाहीही रविवारपासून सुरू केली असल्याचे बाधीतांनी सांगितले. या वादळात घरांचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यातआले.
वादळी पावसात नुकसान झालेल्या शेतकºयांच्या केळीच्या बागांचे नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून काम पूर्ण झाल्यानंतर अहवाल प्रशासनाकडे देण्यात येईल.
-नरेंद्र महाले,
तालुका कृषी अधिकारी, तळोदा.