शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

नंदुरबार पालिका निवडणुकीत ‘विकास’ला मिळते साथ की ‘परिवर्तन’ची धरली जाते कास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:05 PM

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  पालिकेच्या आतार्पयतच्या निवडणुकांमधील सर्वाधिक चुरशीच्या ठरलेल्या यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपने प्रचाराची कुठलीही कसर सोडली नाही. सुरुवातीला ‘विकास’वरून नंतर वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांवर आलेला प्रचार पहाता मतदार ‘विकास’ला साथ देतात की ‘परिवर्तन’ची कास धरतात  हे मतदान यंत्रणातून 14 रोजी कळणारच आहे.  थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीची  पालिकेच्या ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  पालिकेच्या आतार्पयतच्या निवडणुकांमधील सर्वाधिक चुरशीच्या ठरलेल्या यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपने प्रचाराची कुठलीही कसर सोडली नाही. सुरुवातीला ‘विकास’वरून नंतर वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांवर आलेला प्रचार पहाता मतदार ‘विकास’ला साथ देतात की ‘परिवर्तन’ची कास धरतात  हे मतदान यंत्रणातून 14 रोजी कळणारच आहे.  थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीची  पालिकेच्या इतिहासातील ही चौथी निवडणूक आहे. यापूर्वीच्या निवडणुकांचा ट्रेण्ड वेगळा होता. या निवडणुकीचा ट्रेण्ड पुर्णत: बदलेला आहे. भाजप काँग्रेसपुढे आव्हान उभे करण्यात यशस्वी ठरली. प्रचाराचा कल आणि त्या माध्यमातून झालेले आरोप-प्रत्यारोप जनतेमध्ये चर्चेचा विषय ठरले. सुरुवातीपासूनच थेट मतदारांर्पयत पोहचण्याचा प्रय}ात दोन्ही पक्षांनी कुठलीही कसर सोडली नाही. आता मतदार राजा कुणाकडून कल देतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.नंदुरबार पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे विद्यमान नगराध्यक्षा र}ा चंद्रकांत रघुवंशी व भाजपतर्फे डॉ.रवींद्र हिरालाल चौधरी निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय एमआयएम, राष्ट्रीय समाज पक्ष व दोन अपक्ष देखील नशीब अजमावत आहेत. नगरसेवकपदाच्या 39 जागांसाठी देखील दोन्ही पक्षांनी तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रय} केला आहे.निवडणुकीत सुरुवातीच्या काळात प्रचाराचा मुद्दा केवळ विकासाभोवतीच फिरत होता. त्यानंतर प्रचाराच्या मधल्या टप्प्यात गैरव्यवहार, भ्रष्टाचार्पयत प्रचार आला. शेवटच्या टप्प्यात मात्र वैयक्तिक आणि कौटूंबिक आरोप-प्रत्यारोपांर्पयत प्रचार येवून ठेपला. यामुळे मतदारांचे मनोरंजन तर झालेच, परंतु प्रचाराची ही पातळी सुज्ञ मतदारांना रुचली नसल्याचेही चित्र अनेक ठिकाणी दिसून आले.काँग्रेसचा विकासावर जोरकाँग्रेसने प्रचारात शहराच्या विकासावर सर्वाधिक भर दिला. आतार्पयत केलेला विकास आणि शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यात आलेले यश हे मतदारांच्या मनात बिंबविण्याचा प्रय} झाला.आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एकहाती प्रचाराची धुरा सांभाळली. त्यांच्या प्रचाराच्या नियोजनात थेट एलईडी स्क्रीन, कला पथक, वासुदेव, कव्वाली पथक यांचा समावेश करण्यात आला होता. मोठय़ा नेत्यांच्या सभा घेण्याचे टाळले. केवळ माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची एकमेव सभा घेण्यात आली. कॉर्नर सभांच्या माध्यमातून स्वत: रघुवंशी यांनी मतदारांर्पयत आपले विचार आणि भुमिका पोहचविण्याचा प्रय} केला. काँग्रेसला राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने पाठींबा दिला आहे तर समाजवादी पार्टीने देखील पाठींबा दिल्याने काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या आहेत.भाजपतर्फे परिवर्तनाचे आवाहनभाजपतर्फे प्रचारात सर्वाधिक परिवर्तनावर जोर देण्यात आला. सत्ताधारींविरोधातील विविध मुद्दे त्यांच्या प्रचार सभांमधून मांडण्यात आले. शिवाय कुठल्या कामांचे नियोजन आहे ते पटवून देण्याचा प्रय} झाला.भाजपकडे प्रचारकांची फौज होती. खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार शिरिष चौधरी, स्वत: उमेदवार डॉ.रवींद्र चौधरी, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष     विजय चौधरी, हिरालाल चौधरी आदींचा समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेमुळे भाजपच्या आशा वाढल्या आहेत. दुसरीकडे भाजपची जुनी फळी व नेते प्रचारात कुठेही दिसले नाहीत. पक्षातर्फेही कला पथक, वासुदेव, एलईडी स्क्रिन आणि तीनचाकी रिक्षांचा वापर केला. सेनेचेही प्रय}काँग्रेससोबत युती केलेल्या शिवसेनेने आपल्या पाच जागांवरील उमेदवारांच्या प्रचारासाठी देखील मोठय़ा प्रमाणावर प्रय} केला. पक्षाने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भूसे यांची सभा आयोजित केली होती. जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांच्या आई स्वत: उमेवार असल्यामुळे सेनेच्या लढतींकडेही लक्ष लागून आहे.इतर पक्षांचे अस्तीत्वनिवडणुकीत एमआयएम, राष्ट्रीय समाज पक्षांसह अपक्ष देखील काही जागांवर रिंगणात आहेत. एमआयएमचा प्रचार त्यांच्या प्रभाव क्षेत्रात दिसून आला. राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांनी वैयक्तीक प्रचारावर भर दिला. तर काही अपक्षांनी देखील आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रय}   केला. त्यातील दोन प्रभागातील अपक्ष उमेदवार काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांसमोर डोकेदुखी ठरणार आहेत.एकुणच यंदाची पालिकेची निवडणूक दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेस आपली सत्ता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रय} करीत आहे तर भाजपन पहिल्यांदाच पालिकेवर ङोंडा फडकविण्यासाठी कंबर कसली आहे. ‘विकास’ आणि ‘परिवर्तन’ या मुद्यांवर लढविण्यात आलेल्या निवडणुकीत मतदारराजा कुणाच्या बाजुने कौल देतो याकडे आता शहरासह जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.