मोड येथे निंब व निरगुडीचा पाला जाळून धुरळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST2021-04-13T04:28:52+5:302021-04-13T04:28:52+5:30
शासनाकडून कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, ग्रामस्थांनी नवनवीन प्रयोग करण्याचे मोड येथे झालेल्या ग्रामस्थांच्या सभेत ...

मोड येथे निंब व निरगुडीचा पाला जाळून धुरळणी
शासनाकडून कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, ग्रामस्थांनी नवनवीन प्रयोग करण्याचे मोड येथे झालेल्या ग्रामस्थांच्या सभेत ठरविण्यात आले होते. त्यानुसार रविवारी सायंकाळी ग्रामस्थांनी आपापल्या घरासमोर निंब व निरगुडीच्या पाल्यासह कपूर व लसूण जाळून त्याचा धूर करण्यात आला. या प्रयोगामुळे संपूर्ण गावभर धुरळणी झाली. त्यातून गाव निर्जंतुकीकरण होण्यास मदत होणार आहे.
बोरद, मोड, रांझणी, मोहिदा, खेडले आदी गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण व मृत्यूसंख्या वाढत असल्याने ग्रामस्थांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे ठरविले आहे. मोड ग्रामपंचायतीतर्फे सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली असून गावात ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करण्यात आली. गावात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी उपाययोजना राबविण्यासाठी सरपंच जयसिंग माळी, उपसरपंच राजेंद्र राजपूत, ग्रामविकास अधिकारी शांतीलाल बावा, ग्रा.पं. सदस्य सुभाष ठाकरे, सुदाम ठाकरे, रणजित वळवी, गुलाबसिंग गिरासे, संजय नवले, आक्काबाई ठाकरे, वसंत सोनवणे, तापीबाई माळी, अनिता पाडवी, राणाजी भिलावे, रमण चौधरी, सुरेश चौधरी आदींसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.