मालवाहतुकीअभावी शेतकऱ्यांचे हाल, भाजीपाला लिलाव पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:15+5:302021-06-30T04:20:15+5:30

सातपुड्यातील दुर्गम भागात अक्कलकुवा व धडगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना जिल्हा भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला आणण्यासाठी रात्री दोन वाजता वाहतूक व्यवस्था उपलब्ध ...

Due to lack of freight, farmers demand to start auction of vegetables as before | मालवाहतुकीअभावी शेतकऱ्यांचे हाल, भाजीपाला लिलाव पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची मागणी

मालवाहतुकीअभावी शेतकऱ्यांचे हाल, भाजीपाला लिलाव पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची मागणी

सातपुड्यातील दुर्गम भागात अक्कलकुवा व धडगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना जिल्हा भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला आणण्यासाठी रात्री दोन वाजता वाहतूक व्यवस्था उपलब्ध होत नसल्याने वाहतुकीअभावी भाजीपाला पिकांचे नुकसान होत आहे. खासगी वाहनधारकांकडून रात्रीची वाहतुकीसाठी जास्तीची भाडे आकारणी होत असून त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला मार्केटला आणणे जिकिरीचे जात असून मार्केट कमिटीने शेतकऱ्यांच्या समस्येची गंभीर दखल घेऊन भाजीपाला लिलाव पूर्ववत सकाळी ५ वाजता व दुपारी २ वाजता सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना भाजीपाला आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होत नसल्याने भाजीपाला खराब होत आहे. भाजीपाला मार्केट कमिटीने लिलाव पहाटे पाच वाजता व दुपारी दोन वाजल्यापासून सुरू केले तर शेतकऱ्यांना भाजीपाला मार्केटला सकाळी किंवा दुपारी आणता येईल.

- योगेश पवार ,भाजीपाला उत्पादक शेतकरी

रात्री दोनच्या वेळेत शेतकऱ्यांना मार्केटच्या ठरलेल्या वेळेत भाजीपाला विक्रीस आणण्याची मुभा असून रात्री खासगी वाहनाने भाजीपाला मार्केटला आणण्याकरिता जिकिरीचे जात आहे. खासगी वाहनधारकांकडून अतिरिक्त भाडे वसूल करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.

- काशीनाथ पवार, भाजीपाला उत्पादक शेतकरी

Web Title: Due to lack of freight, farmers demand to start auction of vegetables as before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.