शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामरक्षक दलांचा शोध पावणेदोन वर्षापासून संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 12:59 IST

नंदुरबार : ग्रामीण भागात वाढती व्यसनाधिनता नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्रामपंचायती दारु आणि जुगारबंदीचे ठराव करत आहेत़ या ठरावांसह ग्रामपंचायतींना बळ ...

नंदुरबार : ग्रामीण भागात वाढती व्यसनाधिनता नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्रामपंचायती दारु आणि जुगारबंदीचे ठराव करत आहेत़ या ठरावांसह ग्रामपंचायतींना बळ देण्यासाठी मार्च 2017 मध्ये ग्रामरक्षक दल निर्माण करण्याचे आदेश शासनाने काढले होत़े परंतू पावणे दोन वर्ष उलटूनही या रक्षक दलांचा प्रशासन शोध घेत असून हा शोध संपण्याची प्रतिक्षा ग्रामीण भागाला लागली आह़े राज्यात तंटामुक्ती अभियान यशस्वी झाल्यानंतर त्याचधर्तीवर ग्रामरक्षक दल निर्मितीचा शासनाने दिला होता़ यानुसार त्या-त्या गाव शिवारात सुरु असलेले अवैध धंदे रोखण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात येणार होता़ हा प्रयोग पडताळून पाहण्यासाठी गेल्या वर्षात अहमदनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरु झाली होती़ तेथे उपक्रम यशस्वी झाल्यानंतर लागलीच राज्यातील सर्व जिल्ह्यात हा उपक्रम सुरु करण्याचे आदेश शासनाने काढले होत़े नंदुरबार जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे रक्षक दल निर्मितीची जबाबदारी दिल्यानंतर विभागाने प्रांताधिकारी आणि तहसील कार्यालयस्तरावर पत्रव्यवहार करुन गावांचे अर्ज मागवण्याचे सूचित करुन कामकाजाला सुरुवात केली होती़ परंतू वर्षभरात एकही अर्ज उत्पादन शुल्ककडे प्राप्त झाला नाही़ वर्षभर प्रतिक्षा करुन संबधित विभागाने पुन्हा सप्टेंबर 2018 पासून प्रयत्न करुनही अर्ज प्राप्त झालेले नसल्याने या दलांची निर्मिती कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतो आह़े जिल्ह्यातील सर्वच गावांमधून ग्रामपंचायतींना सातत्याने दारुबंदी आणि अवैध धंदे बंद करण्याच्या ठराव करण्याचा आग्रह धरण्यात येत आह़े असे असतानाही ग्रामरक्षक दलासारखा संवेदनशिल विषय बाजूला सारला गेल्याने ग्रामीण भागात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े ग्रामपंचायतींच्या स्वायत्तेत सर्वाधिक उपयोगी निर्णय असूनही रक्षक दल स्थापनेची ‘प्रशासकीय’ उदासिनता ग्रामीण भागात चर्चेचे कारण बनू लागली आह़े ग्रामसभांद्वारे नियुक्त करणारे हे दल सेवाभावी राहणार आह़े दलातील एखाद्या सदस्याला निलंबित करण्यासाठी ग्रामसभाच घेण्याचे निश्चित असून सभेत गावातील 51 टक्के मतदारांविरोधात किंवा बाजूने मतदान केल्यास त्याचे सदस्यत्त्व रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येला समान किमान 11 निव्र्यसनी ग्रामस्थांचे पथक ग्रामसभा घेऊन निवडण्याचे अधिकार देण्यात आले आहेत़ या दलाचा अध्यक्ष आणि सचिवही ग्रामसभेद्वारे निवडीची प्रक्रिया करता येणार आह़े दोन वर्षासाठी नियुक्त होणा:या या रक्षक दलावर गावातील अवैध धंद्यांबाबत उत्पादन शुल्क आणि पोलीस दल यांना कळवणे, दारु पिऊन गावात उपद्रव करणा:या व्यक्तींचे समुपदेशन करणे अथवा त्यांना इशारा देणे, वेळावेळी प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करणे तसेच राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईदरम्यान पंच आणि साक्षीदार म्हणून उपस्थित देणे आदी जबाबदारी निश्चित करण्यात आल्या आहेत़ हे दल स्थापन झाल्यानंतर तीन महिन्यातून एकदा बैठक घेऊन त्याचा वृत्तांत प्रांताधिकारी, पोलीस ठाणे व ग्रामस्तरावर देण्याचे सूचित केले आह़े