शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

खरडी नदीवरील पूल ठरतोय धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 13:27 IST

तळोदा : दोन्ही कठडे नसल्याने शहरातील वाहतुकीला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील खरडी नादीवरील पुलाची अत्यंत दुरावस्था झाली असून, पुलाचे दोन्ही कठडेदेखील नसल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी अक्षरश: धोकेदायक ठरला आहे. सबंधीत यंत्रणेने या प्रकरणी गंभीरदखल घेवून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी आहे.तळोदा शहरातील खरडी नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी पूल उभारला आहे. गेल्या 30 ते 35 वर्षापासूनचा हा पूल आहे. परंतू बांधल्यापासून तर अद्यापपावेतो त्याची एकदाही दुरुस्ती अथवा डागडूजी झालेली नाही. त्यामुळे या पुलाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. तसेच ठिक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहे. एवढेच नव्हे तर दोन्हीं बाजूचे कठडे सुध्दा तुटले आहे. त्यामुळे पुलावरची वाहतूक अक्षरश: धोकेदायक बनली आहे. याठिकाणी कठडे नसल्यामुळे येथून वाहन काढत असताना पादचा:यांना जीव मुठीत घेवून मार्गक्रमण करावे लागत असते. शिवाय याठिकाणी वाहनचालक ही बेदकारपणे वाहने चालवित असतात. अशावेळी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नकारता येत नाही. तीन दिवसापूर्वी येथून दोन भरधाव वेगातील चारचाकी वाहने निघत असतांना पूलाखाली पडताना वाचल्याचे प्रत्यक्ष दर्श्ीनी सांगितले. वास्तविक हा अत्यंत जूना पूल झाला असून, सबंधित यंत्रणेने स्ट्ररल ऑडिटदेखील केले आहे. मात्र अजून ही त्याची नूतनीकरण, दुरुस्ती अथवा डागडूजीबाबत कुठलेही पाऊल उचलले जात नाही. संबंधित विभागाच्या उदासीन धोरणाबाबत येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या पुलाच्या पलीकडे आदिवासी वसाहत आहे. या नागरिकांना पूला वरुनच ये-जा करावी लागत असते. शिवाय अक्कलकुवा रस्त्याकडे जाणारी चारचाकी वाहने या पूला वरुनच जात असतात. त्याच बरोबर शेतकरी ही जातात. साहजिकच पूलावर वहनानांची मोठी वर्दळ होत असते. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून पूलाची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे. परंतू याकडे लोकप्रतिनीधींनी सुध्दा दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. निदान सबंधित विभागाने रायगड येथील सावित्री पूलाची दुर्घटना टाळण्यासाठी या पूलाची दुरुस्ती करावी अशी मागणी आहे