शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

एकाच कुटूंबातील तीन मुलींना पळवून नेल्यामुळेच युवकाचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:48 PM

नवानागरमुठा येथील घटना : जाब विचारणे पडले महागात

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नात्यामधील तिसरी मुलगी पळवून नेल्यानंतर झालेला वाद अखेर युवकाचा जीवावर बेतला. मेवास अंकुश विहिर येथील विकास तडवी याच्यावर चिडलेल्या एकाने धारदार चाकुचा वार करून त्याला संपविले. याबाबत अक्कलकुवा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मेवास अंकुश विहिर येथील विकास जेठय़ा तडवी याने नवानागरमुठा येथील नारायण गुलाब तडवी यांच्या मोठय़ा भावाच्या मुलीस पळवून नेवून लगA केले होते. काही दिवसानंतर तिला सोडून दिले. त्यानंतर या मुलीच्याच लहान बहिणीला त्याने पळवून नेले. काही दिवसांनी तिलाही तो माहेरी सोडून गेला. त्यामुळे आजारपणामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर विकास याने पुन्हा नारायण तडवी यांच्या कोराई येथील नातेवाईकाच्या मुलीला पळवून नेले होते. त्याचा राग नारायण तडवी यांना होताच. विकास हा कधी भेटतो याकडे त्यांचे लक्ष होते. अखेर 17 मे रोजी विकास हा नवानागरमुठा येथे त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी आल्याची माहिती नारायण तडवी यांना मिळाली त्यांनी तेथे जावून विकास याच्याशी वाद घालून ठार मारण्याची धमकी दिली होती.  याबाबत विकास याने विनोद फत्तेसिंग तडवी यांना ही बाब सांगितली. त्याचा जाब विचारण्यासाठी विनोद व विकास हे नारायण तडवी यांच्याकडे गेले. तेथे त्यांच्यात मोठा वाद झाला. रागाच्या भरात नारायण तडवी यांनी त्यांच्याकडे असलेल्या धारदार जामीयाने अर्थात चाकुने विकास याच्यावर वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार घेतांना त्याचा मृत्यू झाला. याबाबत विनोद फत्तेसिंग तडवी यांनी अक्कलकुवा पोलिसात फिर्याद दिल्याने नारायण तडवी यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात  खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.