शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आठवडाभर कोरडय़ा हवामानाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 3:06 PM

उत्तर महाराष्ट्र : बंगालच्या उपसागरात द्रोणीय स्थिती, वा:यांची दिशा दक्षिण-पूर्व

नंदुरबार : श्रीलंकेजवळील बंगालच्या उपसागरात तळाशी द्रोणीय भागाची निर्मिती झाली आह़े त्यामुळे वा:यांच्या दिशेत बदल होऊन परिणामी उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात काही अंशी वाढ झाली आह़े येत्या काही दिवसात हीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आह़े नंदुरबारात बुधवारी 31.2 कमाल तर 13 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आल़े वातावरणीय बदलामुळे उत्तर महाराष्ट्रात किमान व कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज ‘आयएमडी’च्या हवामानतज्ज्ञ डॉ़ शुभांगी भुते यांनी वर्तविला़ ‘लोकमत’ला अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की, श्रीलंकेजवळ बंगालच्या उपसागरात तळाशी द्रोणीय स्थिती निर्माण झालेली आह़े यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन परिणामी वा:यांची दिशा बदलली आह़े सध्या उत्तर महाराष्ट्रासह राज्यात दक्षिणेकडून-पुव्रेकडे वारे वाहत आहेत़ त्यामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता  वाढत आह़े उत्तर महाराष्ट्राची स्थितीनंदुरबारात बुधवारी 31.2 कमाल तर 13 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आल़े तर, जळगावात कमाल 29.7, किमान 10.4, धुळे कमाल 31.1 तर, किमान 11.1, नाशिक कमाल 30.2 तर किमान 10.2, मालेगाव कमाल 28 तर किमान 12 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले आह़े दरम्यान, आयएमडीकडून देण्यात आलेल्या इशा:यानुसार उत्तर महाराष्ट्रात ताशी 20 ते 25 किमी गतीने वारे वाहण्याचे सांगण्यात आले आह़े त्यामुळे उत्तरेकडून येणा:या शितलहरींना अडथळा निर्माण होऊन परिणामी थंडीत घट दिसून येईल़  दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारात सकाळी तसेच रात्रीच्या वेळी थंडी जाणवत आह़े तर दुपारच्या वेळी काही प्रमाणात उकाडा आह़े नंदुरबारात संमिश्र वातावरण असल्याचे दिसून येत आह़े  दरम्यान, बंगालच्या उपसागरात सध्या द्रोणीय भागामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आह़े परंतु तुर्त चक्रीवादळाचा धोका नसल्याचे सांगण्यात आले आह़े दरम्यान, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात घट दिसून आली़ तसेच मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान  खाली गेले होत़े तसेच उर्वरीत राज्यात किमान तापमाना एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झालेली होती़ राज्यातील प्रमुख शहरांमधील किमान तापमान : मुंबई (कुलाबा) 20.5, सांताक्रुझ 18.0, अलिबाग 18.8, रत्नागिरी 18.9, पणजी (गोवा) 19.1, डहाणू 17.7, पुणे 11.8,अहमदनगर 10.6, जळगाव 10.0, कोल्हापूर 16.5, महाबळेश्वर 14.6, मालेगाव 11.6, नाशिक 11.0, सांगली 13.4, सातारा 13.4, सोलापूर 15.6, औरंगाबाद 12.0, परभणी 13.0, अकोला 11.7, अमरावती 11.4, बुलडाणा 12.0, चंद्रपूर 11.8, गोंदीया 8.0, नागपूर 7.3, यवतमाळ 14.4 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आल़े कोरडय़ा हवामानातचा अंदाजराज्यात 20 जानेवारीर्पयत अंशत: कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आह़े त्यामुळे विदर्भात थंडीची लाट निर्माण होण्याचीही शक्यत वर्तविण्यात आली आह़े सर्वसाधारणत: संपूर्ण जानेवारी महिना थंडीचा जोर असतो़ तर त्यानंतर फेब्रुवारीपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात होत असत़े यंदा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, मराठवाडय़ात कमी पजर्न्यमानामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती़ त्यामुळे हिवाळा पाहिजे तसा जानवणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता़ परंतु यंदा थंडीचा मुक्काम जानेवारीर्पयत कायम राहणार असल्याचे दिसून येत आह़े