शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

दुष्काळी झळातही सातपुड्याची केळी निघाली ‘सौदी’ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:23 PM

नंदुरबार : यंदा दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे चेहरे कोमेजायला आले असतानाच रक्ताचे पाणी करुन केळीची जोपासना करणाºया सुमारे १०० पेक्षा ...

नंदुरबार : यंदा दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे चेहरे कोमेजायला आले असतानाच रक्ताचे पाणी करुन केळीची जोपासना करणाºया सुमारे १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची केळी सौदी अरेबियात निर्यात झाली आहे़ आतापर्यंत जवळपास ११० कंटेनर रवाना झाले असून महिनाभरात १५० पेक्षा अधिक कंटेनर केळी सातासमुद्रापार जाणार आहे़जिल्ह्यात ऊसाबरोबरच पपई, मिरची आणि केळी हे बागायती पिके घेतली जातात़ शेतकºयांनी आधुनिकतेची कास घेत शेती हायटेक केली आहे़ त्याचे चांगले परिणाम गेल्या काही वर्षापासून दिसत आहेत़ विशेषत: केळी उत्पादक शेतकºयांनी धाडस करुन निर्यातीसाठी पुढाकार घेतला़ त्यासाठी काही कंपन्यांशी समन्वय साधून तज्ञाच्या मार्गदर्शनानुसार शेतकरी गट तयार केला़ या गटात मोठ्या प्रमाणावर शेतकºयांनी सहभाग घेतला आहे़ सुमारे १०० पेक्षा अधिक शेतकºयांनी जवळपास १२ लाख केळीच्या रोपांची लागवड केली होती़ त्याचे उत्पादन सुरु झाले असून ही केळी आता, निर्यात होऊ लागली आहे़ ब्राह्मणपुरी, पाडळदा, म्हसावद यासह इतर गावातील शेतकरी त्यात सहभागी झाले आहेत़ यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे़ त्यामुळे पिके वाचवणे शेतकºयांसाठी अवघड होत असून अशा बिकट परिस्थितीतही केळी उत्पादक शेतकरी केळीची जोपासना करण्यात दिवसरात्र एक करीत आहेत़ त्याचे फलीत त्यांना दिसू लागले असून या केळींच्या बागांपुढे आता निर्यातीसाठी कंटेनर लागू लागले आहेत़ विशिष्ट पद्धतीने केळीच्या घडाची कापणी करुन त्यावर प्रक्रिया करीत केळीची पॅकिंग केली जात आहे़ यातून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे़