शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सलग सहा निवडणुका जिंकणारे डॉ.विजयकुमार गावीत झाले चौथ्यांदा मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 17:34 IST

Vijayakumar Gavit : ज्येष्ठ नेते डॉ.विजयकुमार गावीत यांनी मंगळवारी चौथ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अपक्षापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा राहिला आहे.

- रमाकांत पाटीलनंदुरबार : ज्येष्ठ नेते डॉ.विजयकुमार गावीत यांनी मंगळवारी चौथ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अपक्षापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा राहिला आहे. २०१४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. या पक्षात त्यांना पहिल्यांदा मंत्रीपद मिळाले आहे.

राजकारणाचा मोठा वारसा असलेल्या डॉ.विजयकुमार गावीत यांनी शासकीय नोकरी सोडून १९९५ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी त्यावेळी पहिल्यांदाच अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राज्यातील तत्कालिन भाजप-शिवसेना युती सरकारला त्यांनी पाठींबा दिला होता. विशेषत: नंदुरबार जिल्हा निर्मितीसाठी पाठपुरावा केला. त्याचदरम्यान त्यांना युती सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळाले आणि पुढे काही दिवसातच जिल्ह्याची निर्मितीही झाली. त्यामुळे जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.

१९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन त्या पक्षातर्फे निवडणूक लढवली. त्यावेळीही ते मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी झाले आणि आघाडी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले. त्यांना आदिवासी विकास विभाग खाते मिळाले होते. त्या माध्यमातून त्यांनी कामाचा सपाटा सुरू केला. त्यांची कारकीर्द पुढे वादातीतही ठरली. पण आदिवासी विकासमंत्री म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. त्याच कामाच्या बळावर २००९ मध्ये देखील ते विधानसभा निवडणूक जिंकले आणि पुन्हा तिसऱ्यांदा मंत्री झाले. त्यावेळी त्यांनी वैद्यकीय शिक्षण, फलोत्पादन आणि पर्यटन विभागाची जबाबदारी सांभाळली.

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांची कन्या डॉ.हीना गावीत यांना भाजपतर्फे लोकसभेची उमेदवारी मिळाली व त्या निवडूनही आल्या. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ.गावीत यांनीही भाजपतर्फे उमेदवारी केली. सलग पाचव्यांदा ते विजयी झाले. पण तेव्हा मात्र त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. २०१९ मध्येही सलग सहाव्यांदा झाले. पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. आता भाजप व शिवसेना शिंदे गटाचे युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांना चौथ्यांदा मंत्रीपद मिळाले आहे.

टॅग्स :Vijaykumar Gavitविजय गावीतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार