शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

आदेशांचे उल्लंघन करू नका अन्यथा कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 12:41 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नागरिकांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन न करता घरातच बसून रहावे व प्रशासनास मदत करावी. ठरवून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : नागरिकांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन न करता घरातच बसून रहावे व प्रशासनास मदत करावी. ठरवून दिलेल्या वेळेतच अत्यावश्यक सामान घेण्यासाठी घराबाहेर पडावे अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिला आहे.प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी आदींसह कर्मचाऱ्यांचे पथक शहरात गस्त घालून नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन करीत आहेत. पहिले दोन दिवस वगळता आता नागरिकांमध्ये हळूहळू प्रशासनाचे म्हणणे रुजत असल्याचे चित्र आहे. भाजीपाला विक्रीसाठीही शहरात ठिकठिकाणी सोय करण्यात आली असून नागरिकांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.वाघ यांनी केले आहे.पोलिसांकडून गस्तसंचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले असून सकाळी बाजारपेठेत भाजीपाला, दूध, धान्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. दिवसभरात पोलिसांकडून वाहनधारकांची चौकशी करून त्यांना माघारी पाठविण्यात आले. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना तंबीही देण्यात आली. दिवसभर पोलिसांकडून शहरात गस्त घालण्यात येत असून काहींना पोलिसांकडून ‘प्रसाद’ही दिला जात आहे. ही कारवाई होऊ नये म्हणून घरी थांबणे योग्य समजावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी केले आहे.प्रांताधिकाºयांचे आवाहनशहाद्यातील कष्टकºयांच्या सोयीसाठी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी पुढाकार घेत त्यांना मदत करण्यासाठी आवाहन केले आहे. रोजंदारीने उदरनिर्वाह करणाºया कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून गिरासे यांनी सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन केले आहे. शासनाकडून मार्च व एप्रिल महिन्याचे धान्य मिळणार असले तरी सध्या इतर जीवनावश्यक वस्तू देणे आवश्यक आहे. अनेक स्वयंसेवी संघटना मदत करण्यासाठी इच्छुक असून सालदारनगर, शिवाजीनगर यासह इतर गरीब लोकांच्या वस्तीत गरजू कुटुंबांना किमान चार-पाच दिवस जीवनावश्यक वस्तूंची किट देणे योग्य ठरेल. दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संघटनांनी जर किट्स विकत घेऊन जमा केल्यास गरीब वस्तीत नगरपालिका प्रशासनामार्फत वाटप करण्याचे नियोजन करता येईल. नगरपालिकेची टीम तयार करून एका ठिकाणी किट्स जमा करुन स्वयंसेवी संस्थांचे एक दोन प्रतिनिधी व नगरपालिका कर्मचाºयांमार्फत ते वितरीत करता येईल. इच्छुकांनी मदत देण्यासाठी लक्ष्मण कोळी (मो.८३२९८१७०३३), संदीप टेंभेकर (मो.८६६९१३२७२३) व चेतन गांगुर्डे (मो.८२७५५६३९३९) या कर्मचाºयांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.