जिवनावश्यक वस्तूंचा अतिरिक्त साठा करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:30 IST2020-03-26T12:29:53+5:302020-03-26T12:30:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत निर्गमित करण्यात आलेले सर्व आदेश पुढील २१ दिवस अर्थात ...

जिवनावश्यक वस्तूंचा अतिरिक्त साठा करू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत निर्गमित करण्यात आलेले सर्व आदेश पुढील २१ दिवस अर्थात १४ एप्रिल रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होण्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
गदीमुुळे करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी एकत्र फिरू नये किंवा एकाच ठिकाणी गर्दी करू नये. पेट्रोल, डिझेल, किराणा सामान, दूध, अंडी, मांस, फळे, भाजीपाला, ब्रेड, मासे आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार असल्याने एकाचवेळी खरेदीसाठी गर्दी करू नये, तसेच वस्तूंचा अतिरिक्त साठादेखील करू नये. स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी, न.प.चे मुख्याधिकारी यांनी समन्वयाद्वारे दुकानांची वेळ निश्चित करून नागरिकांना त्याची माहिती द्यावी.
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाºया वाहनांना जिल्ह्यात येण्यास व बाहेर जाण्यास अनुमती देण्यात आली आहे. अशा वस्तूंच्या वाहतूकीत काही अडथळे आल्यास तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. आपल्या वाहनांवर ह्यअत्यावश्यक सेवाह्ण असे ठळकपणे दिसणारे स्टीकर लावावे. नागरिकांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे व अनावश्यक बाहेर फिरू नये. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जागतिक आरोग्य संघटना, केंद्र व राज्य सरकार यांच्यामार्फत आलेल्या सुचनांचे पालन व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्णत: खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनदेखील डॉ.भारूड यांनी केले आहे.
ग्रामीण भागात स्वच्छता मोहिम
करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण भागात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. ठिकठिकाणी फवारणी करून निर्जतुकीकरण करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना वैयक्तिक व परिसराची स्वच्छता राखण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. काही ठिकाणी स्थानिक भाषेतून संदेश देण्यात येत आहे. घंटागाडी व रिक्शद्वारे संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहनदेखील करण्यात येत आहे.
बाहेरून आलेल्या प्रवाशांचे प्रबोधन
बाहेरील जिल्हा अथवा राज्यातून आलेल्या प्रवाशांचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रबोधन करण्यात येत असून त्यांना आवश्यक दक्षता बाळगण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. आवश्यकता असल्यास क्वॉरंटाईन केंद्रात त्यांना ठेवण्यात येत आहे. काही व्यक्तिंना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. गुजरात येथून आलेल्या मजूरांचीदेखील आमलाड येथे आरोग्य तपासणी करण्यात आली.
चोख पोलीस बंदोबस्त
संचारबंदीचे पालन योग्यरितीने होण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची तपासणी करून केवळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाºया वाहनांना सोडण्यात येत आहे.
अनावश्यक बाहेर फिरणाºयांविरूद्ध कडक कारवाई करण्याबरोबर गरजू व्यक्तीस मदत करताना पोलिसातल्या माणूसकीचे दर्शनही अशावेळी घडते आहे.
करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात येणाº्या व जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पोलीस दलामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. पोलिसांना सहकायार्साठी २०० होमगार्डची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. होमगार्डची सेवा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी होमगार्ड महासमादेशक यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. जिल्ह्यात संचारबंदीची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यासाठी होमगार्डची सेवा उपयोगी ठरणार आहे.
जिल्ह्यात विविध ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या क्वॉरंटाईन केंद्रात बाहेरच्या राज्यातून किंवा जिल्ह्यातून आलेल्या संशयित व्यक्तिंना ठेवण्यात येणार आहे. आतापर्यंत क्वॉरंटाईन व्यक्तिंचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. भविष्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास व संसर्ग वाढल्यास आवश्यक तयारीचा भाग म्हणून जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षेच्या साधनांची पुरेशा प्रमाणात तातडीन व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी यंत्रणेला दिले. चेहºयाचे आच्छादन, गॉगल, मास्क आदी आवश्यक साहित्य आयसोलेशन सेंटरच्या ठिकाणी उपलब्ध असावे असे त्यांनी सांगितले.