शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

जिल्हा विकासाला आता तरी गती मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 12:58 IST

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात गेल्या तीन दशकांपासून कार्यरत असलेले ज्येष्ठ नेते अ‍ॅड.के.सी. पाडवी ...

रमाकांत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात गेल्या तीन दशकांपासून कार्यरत असलेले ज्येष्ठ नेते अ‍ॅड.के.सी. पाडवी यांना त्यांच्या आवडीचे आदिवासी विकास विभागाचे मंत्रीपद मिळाले आहे. नव्हे तर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याचकडे आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेच्याही अपेक्षा उंचावल्या असून गेल्या काही वर्षांपासून थांबलेल्या जिल्ह्याच्या विकासाला ते गती देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्ह्याला मागासपणातून बाहेर काढण्यासाठी अनेक विकासाचे प्रकल्प प्रस्तावित असून स्वत: मंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनीही त्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. आता त्यांच्याकडे मंत्रीपद आल्याने रखडलेल्या प्रस्तावित प्रकल्प ते मार्गी लावतील, असा जनमानसातील सूर आहे.नंदुरबार जिल्ह्याला गेल्या पाच दशकात किमान दोन दशकाहून अधिक काळ आदिवासी विकास मंत्रीपद मिळाले आहे. त्यातून आदिवासी विकास विभागाच्या काही योजना निश्चितच जिल्ह्यात राबवल्या गेल्या. पण अजूनही सकारात्मक विकासाचा बदल दिसून येत नाही. आदिवासींचे आरोग्य, शिक्षण, रोजगाराच्या प्रश्नांना ज्या प्रमाणात न्याय मिळायला हवा होता तो मिळालेला नाही. दुर्गम भागातील रस्ते, वीज, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे या जिल्ह्यात करण्यासारखे खूप आहे. केवळ राजकीय आणि प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव आहे.योगायोग म्हणा जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच जिल्ह्यातील समस्यांची जाण असलेले जिल्हाधिकारी लाभले आहेत. डॉ.राजेंद्र भारुड यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण याच जिल्ह्यात झाले आहे. शिवाय या भागाशी ते जुळले आहेत. दुसरीकडे अ‍ॅड.के.सी. पाडवी यांच्यासारख्या अनुभवी व सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या नेत्याला जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. शिवाय त्यांच्याकडे राज्याचे आदिवासी विकास मंत्रीपदही आहे. त्यामुळे विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी या जोडीला चांगली संधी आहे.खरे तर सातपुड्यातील आदिवासींच्या विकासासाठी पर्यावरण, पर्यटन, रोजगाराचे अनेक प्रस्ताव यापूर्वी मंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी मांडले आहेत. आमसूल प्रक्रिया उद्योग केंद्राचा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आदिवासींचा सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठीही त्यांची धडपड आहे. पुणे येथे असलेले आदिवासी संशोधन केंद्र नंदुरबार जिल्ह्यात धडगाव येथे स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव १९९५ मध्ये तत्कालिन उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांनी मांडला होता. या प्रस्तावाला आता चालना देऊन ते धडगावला आणल्यास त्या माध्यमातून धडगावच्या विकासाला अनेक माध्यमातून गती मिळू शकते. मोलगी स्वतंत्र तालुका करण्याचा प्रस्ताव आहे, सोलापूर-अहमदाबाद हा प्रस्तावित राष्टÑीय महामार्ग धडगाव-मोलगी व्हाया जाणारा आहे त्यालाही चालना मिळणे आवश्यक आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालय, औद्योगिक वसाहत, रखडलेले सिंचन प्रकल्प या प्रस्तावित प्रकल्पांना गती मिळायला हवी.जिल्ह्यातील ७३ वनगावांना महसूली दर्जा मिळण्यासाठी मंत्री अ‍ॅड.पाडवी यांनी दिल्लीपासून धडगावपर्यंत उपोषण केले. त्यातून गेल्यावर्षी हा प्रश्न मार्गी लागला असला तरी अ‍ॅड.पाडवी यांच्या अपेक्षेनुसार तो सुटलेला नाही. त्याला सुधारित पद्धतीने मंजुरी देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील कुपोषणाची आणि शाळेतील गळतीची आकडेवारी कशी कागदावरच कमी होते, रोजगार हमीचे मजूर, अंगणवाडीतील उपस्थिती, रेशनचे धान्य वाटप कसे कागदावरच वाढते, प्रशासनाचे हे वकूब अ‍ॅड.पाडवी हे चांगले जाणून आहेत. त्या त्रुटी दूर होऊन वास्तव विकासाला चालना ते देतील, अशी अपेक्षा आहे.पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने या जिल्ह्यात करण्यासारखे खूप काही आहे. योगायोग हाही म्हणा की तीन वर्षापूर्वीच विद्यमान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे तरंगत्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पणासाठी आले होते. त्यांनी आदिवासींच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा असलेल्या ठिकाणांच्या विकासाची कल्पना मांडली होती. त्यामुळे त्यांच्याकडे पाठपुरावा करून सातपुड्यात ‘अ’ दर्जाचे पर्यटन विकास होणे अपेक्षित आहे. आदिवासींचे कुलदैवत याहामोगी मातेचे जन्मस्थान असलेल्या डाब या क्षेत्राचा तसेच अस्तंबा ऋषींचे देवस्थान असलेल्या अस्तंबा येथे तीर्थक्षेत्र विकासांतर्गत अनेक विकासाचे प्रकल्प राबवता येणे शक्य आहे. महाराष्टÑातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळच्या विकासाचे अनेक प्रस्ताव धूळखात पडले आहेत. प्रकाशा ते सारंगखेडा या दोन्ही बॅरेजदरम्यान तापी काठावरील विकास आणि हेलिकॉप्टरद्वारे हवाई सफरची योजनाही प्रस्तावित आहे. सातपुड्यात खूप असा ठेवा आहे जो जगाला भुरळ घालणारा आहे. त्याचे सादरीकरण व पर्यटकांना आकर्षित करेल असे दृष्यस्वरुप त्याला देण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने आजवर सातपुड्यातील दारिद्र्य आणि मागासपणच लोकांसमोर अधिक प्रमाणात आले आहे. हे मागासपण आणि दारिद्र्य दूर करून त्याच्या श्रीमंतीचे वैभव वाढवण्यासाठी खºया अर्थाने काम करावे लागणार आहे. हे काम विद्यमान आदिवासी विकास मंत्री व पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी करतील, अशी अपेक्षा जनतेला लागून आहे.