जिल्हा बँकेच्या १७ हजार सभासद शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:23 IST2019-12-25T12:23:22+5:302019-12-25T12:23:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य शासनाने महात्मा फुले कृषी कर्जमाफीची घोषणा करुन दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची ...

जिल्हा बँकेच्या १७ हजार सभासद शेतकऱ्यांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य शासनाने महात्मा फुले कृषी कर्जमाफीची घोषणा करुन दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे़ यातून यंदाच्या हंगामात कर्ज घेणाऱ्या १३ हजार शेतकऱ्यांसोबत २०१५ पासून धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेणाºया १७ हजार थकबाकीदारांना दिलासा मिळणार असून त्यांचे कर्जही माफ होणार आहे़
कर्जमाफी योजनेंतर्गत २०१५ पासून शेतकºयांच्या डोक्यावरील दोन लाख रुपयांपर्यंतचा कर्जाचा भार कमी करण्याचा निर्णय शासनाने लागू केल्यानंतर सोमवारपासून सहकारी आणि राष्ट्रकृत बँक प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे़ प्रशासकीय विभागांकडून आदेश मिळाल्यानंतर या बँकांकडून थकीत कर्जाच्या याद्या तयार करण्याचे काम सुरु झाले आहे़ शासनाकडून मंगळवारी दुपारी बँकांना माहिती भरुन देण्याबाबत अधिकृत आदेश आणि अर्ज प्राप्त झाले आहेत़ यानुसार हे कामकाज सुरु झाले आहे़ सर्वाधिक शेतकरी सभासद असलेल्या धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रशासनाकडून सुरु करण्यात आलेल्या प्रक्रियेचा लाभ सभासद शेतकºयांना होणार असून यंदाच्या वर्षातील साडेपाच हजार शेतकºयांना थेट लाभ मिळणार असल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे़
दरम्यान यापूर्वीही कृषी विभाग, उपनिबंधक आणि महसूल शाखा यांच्याकडून कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांच्या याद्या मंत्रालय स्तरावर मागवण्यात आल्याची माहिती आहे़ यात प्रामुख्याने विमाधारक शेतकºयांच्या आकड्यांवर चर्चा झाली होती़ कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकºयांच्या याद्या यापूर्वी तयार करण्यात आल्या आहेत़ चालू आठवड्यात अध्यादेश निघाल्यानंतर पात्र शेतकºयांच्या याद्यांनुसार कामकाज होणार असल्याने कर्जमाफीला विलंब लागणार नसल्याचे बँकांच्या अधिकाºयांकडून सांगण्यात आले आहे़ प्रशासकीय स्तरावरही कामकाजाला सुरुवात झाल्याची माहिती आहे़
यंदाच्या खरीप हंगामात जिल्हा बँकेने ५ हजार ५३९ सभासदांना ४३ कोटी ९३ लाख ११ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे़ यातून साडेआठ हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे़ त्यातुलनेत जिल्ह्यातील ११ राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमधून केवळ ७ हजार ९४७ शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले होते़ यातून यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १३ हजार ४८६ शेतकऱ्यांनी १८९ कोटी ८९ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे़ यातील सर्वात मोठा हिस्सा हा जिल्हा बँकेचा आहे़
एकीकडे यंदाच्या वर्षातील सभासदांना थेट लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट होत असतानाच दुसरीकडे जिल्हा बँकेच्या २०१५ पासून थकीत ८९ कोटी ८८ लाख रुपये कर्जाची माफीही होणार आहे़ नंदुरबार जिल्ह्यातील २९ शाखांमधील १७ हजार शेतकºयांकडे हे कर्ज थकीत आहे़ बहुतांश कर्ज हे दीड ते पावणे दोन लाखापर्यंत असल्याने त्याची माफी होणे सुलभ होणार आहे़
बँकेने २०१५-१६ या वर्षात ४३ कोटी ५३ लाख रुपये़
२०१६-१७ या वर्षात ४२ कोटी ३४ लाख ११ हजार रुपये़
२०१७-१८ या वर्षात ३३ कोटी ४४ लाख ४३ हजाऱ
२०१८-१९ या वर्षात २६ कोटी ३९ लाख़
२०१९-२० च्या खरीप हंगामात तब्बल ४२ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे़
कर्जमाफीची प्रक्रिया सुरु होणार असली तरी यापासून यंदा सुमारे ५१ हजार शेतकरी वंचित राहणार आहेत़ याचे प्रमुख कारण म्हणजे जिल्हा प्रशासनाने खरीप २०१९ साठी बँकांना ५९ हजार ३३५ शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे आदेश दिले होते़ परंतू बँकांनी जुलैअखेरपर्यंत चालढकल केल्याने केवळ साडेसात हजार शेतकऱ्यांना पीककर्ज मिळू शकले़ उर्वरित ५१ हजार शेतकºयांना कर्ज मिळाले नाही़ बँकांनी उद्दीष्ट्यपूर्ती केली असती तर कर्जमाफीदार शेतकºयांची संख्या वाढली असती़