जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना २७ कोटींचे पीककर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:39 IST2020-05-21T12:39:35+5:302020-05-21T12:39:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना देण्यात येणाºया पीक ...

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना २७ कोटींचे पीककर्ज वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना देण्यात येणाºया पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे़ यातून आतापर्यंत ४५ टक्के कर्जवाटप पूर्ण झाले असून ५५ टक्के कर्जाचे वाटपही जूनमध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे़
एप्रिल महिन्यापासून जिल्हा बँकेने कर्जाचे वाटप सुरु केले आहे़ यातून आजअखेरीस २७ कोटी २९ लाख ४० हजार रुपयांचे पिक कर्ज वाटप झाले आहे़ जिल्ह्यात बँकेकडून विविध कार्यकारी संस्थांच्या मार्फत कर्जाचे वाटप करण्यात येते़ यातून आतापर्यंत २३५ पैकी १४५ संस्थांनी त्यांच्या सभासद शेतकºयांना कर्ज पुरवठा केल्याने शेतीकामांना वेग आल्याची माहिती आहे़ दरम्यान २ हजार ८४० खातेदारांना बँकेच्या जिल्ह्यातील २९ शाखांमधून कर्ज वाटप करण्यात आले आहे़ राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत यंदा बँकेने कर्ज वाटपाला वेग दिला असल्याने शेतकºयांना खरीप हंगामाचे नियोजन करणे सोपे झाले आहे़ यंदा बँकेने शेतकºयांची गर्दी टाळण्यासाठी रुपे कार्डच्या माध्यमातून कर्ज वाटप केले आहे़ यातून शेतकºयांना विविध कार्यकारी संस्था आणि बँकेच्या शाखेतून मोबाईलवर मेसेज देऊन वाटप करण्यात आलेल्या कार्डच्या माध्यमातून मंजूर केलेल्या कर्जाची माहिती मिळत आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कर्ज वितरणात अडचणी येण्याची शक्यता शेतकºयांनी वर्तवली होती़ परंतू याउलट स्थिती सध्या आहे़
दुसरीकडे महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्जमाफी योजनेसह २०१७ नंतरच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीच्या याद्यांमध्ये नावे नसल्याने अनेक शेतकºयांना कर्ज मिळण्यास येणाºया अडचणी कायम आहेत़ मागील थकीत रक्कम जैसे थे असल्याने शेतकºयांना नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत़ जिल्हा बँकेत गेल्या वर्षाच्या परतावा देणारे शेतकरी आणि संस्था यांना प्रथम प्राधान्याने कर्ज दिले जात आहे़ जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेत कर्जमागणी करणाºया शेतकºयांना नाहकरत प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रे मिळण्यास अडचणी येत असल्याने शासनाने कर्जमाफीच्या याद्या देऊन पीक कर्ज मिळण्याचा अडसर दूर करण्याची मागणी केली आहे़
आजअखेरीस नंदुरबार तालुक्यात ६० संस्था व १ हजार १९७, शहादा ५९ संस्था व १ हजार २३२ शेतकरी, तळोदा १० संस्था १२८ शेतकरी, अक्कलकुवा १ संस्था १८ शेतकरी तर नवापुर तालुक्यात १५ संस्था व २६५ सभासद शेतकरी यांना कर्ज देण्यात आले आहे़ शेतकºयांना देण्यात आलेल्या या कर्जामुळे जिल्ह्यातील ४ हजार ५४६ क्षेत्र संरक्षित करण्यात आले असल्याची माहिती आहे़