जिल्हाबाहेरून आलेल्यांची तपासणी नसल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 12:01 IST2020-05-25T12:01:15+5:302020-05-25T12:01:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : चौथ्या लॉकडाऊनमध्ये केंद्र व राज्य शासनाने संचारबंदीचे नियम शिथिल केल्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत होऊन ...

Dissatisfied with the lack of investigation of those who came from outside the district | जिल्हाबाहेरून आलेल्यांची तपासणी नसल्याने नाराजी

जिल्हाबाहेरून आलेल्यांची तपासणी नसल्याने नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : चौथ्या लॉकडाऊनमध्ये केंद्र व राज्य शासनाने संचारबंदीचे नियम शिथिल केल्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत होऊन चाकरमानी ही मोठ्या शहरातून गावाकडे परतत आहेत. नियामानुसार जिल्हा बाहेरील व्यक्ती गावाकडे आली तर त्याला गावातील आरोग्य केंद्रात त्याची तपासणी करून १४ दिवस होमक्वॉरंटाईन व्हावे लागते. परंतु काही नागरिक जिल्हा बाहेरून आल्यानंतरही राजरोसपने बाजारात किंवा बाहेर फिरत आहेत.
या बेपर्वाहीमुळेच गेल्या सहा दिवसात ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे खेडेगावात व तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिल्या, दुसऱ्या, तिसºया व आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हाधिकारी, महसूल,पोलीस प्रशासन, आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत प्रशासन जिल्ह्यात समन्वयाने व डोळ्यात तेल घालून काम करत आहे. नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा या शहरी भागात आणि बामखेडा,आष्टे, नटावद सारख्या ग्रामीण भागात सुद्धा प्रशासन कोरोनामुक्त करण्यास यश मिळाले होते. परंतु नागरिकांच्या बेफिकरिमुळे त्या आनंदावर विरजन पडले. खेडेगावात कोरोनाने आता खरा प्रवेश करण्यास सुरूवात केली आहे. म्हणून बाहेरगावाहुन व जिल्हा बाहेरून आलेल्या व्यक्तींनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून आरोग्य तपासणी करून १४ दिवसांपर्यंत क्वॉरंटाईन होऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्यातील ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस पाटील संघटनेकडून करण्यात येत आहे.

Web Title: Dissatisfied with the lack of investigation of those who came from outside the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.