धनाढ्यांचे अतिक्रमण न काढल्याने असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 12:16 IST2019-12-18T12:16:02+5:302019-12-18T12:16:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पालिकेने तीन दिवस राबविलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत केवळ सर्वसामान्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. अनेक धनाढ्य ...

Discontent over not encroaching on the rich | धनाढ्यांचे अतिक्रमण न काढल्याने असंतोष

धनाढ्यांचे अतिक्रमण न काढल्याने असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पालिकेने तीन दिवस राबविलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत केवळ सर्वसामान्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. अनेक धनाढ्य व्यावसायिकांनी नियमबाह्य बांधकाम करून शहरातील मुख्य रस्ते अडविले आहेत. पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. अशा धनाढ्य व्यावसायिकांचे, खाजगी व्यापारी संकुलाच्या मालकांचे अतिक्रमण पालिका प्रशासनाने काढले नसल्याने नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष वाढला आहे.
गरीबांच्या अतिक्रमणावर हातोडा आणि धनिकांच्या अतिक्रमणाला संरक्षण असा प्रकार पालिका प्रशासनाने केले असल्याच्या प्रतिक्रिया शहरात उमटत आहे. पालिका प्रशासनाने कुठलाही दुजाभाव न करता सरसकट सर्वांचेच अतिक्रमण काढावे केवळ अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली वारंवार शहर उद्ध्वस्त करू नये, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे
जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम पालिकेतर्फे राबविण्यात आली. परिणामी शहरातील विविध रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. तथापि, लॉरीधारकांसह अवैध प्रवासी वाहतुकीच्या वाहनांनी या रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने वाहतुकीची समस्या ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेने राबविलेल्या अतिक्रमणाचा मूळ उद्देश असफल ठरत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
शहरातील एका शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी गेल्या आठवड्यात शहाद्यात आले होते. मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणामुळे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनाच वाहतूक कोंडीतून मार्गक्रमण करावे लागले होते. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरत शहरातील रहदारीस अडथळा ठरणाºया व्यावसायिक अतिक्रमणासोबत विविध भागातील कच्चे व पक्के अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई करण्याची सूचना केली होती. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने तात्काळ विविध भागात रिक्षा फिरवून ध्वनीक्षेपकाद्वारे उद्घोषणा करुन अतिक्रमण काढून घेण्याबाबत सूचित केले होते. अतिक्रमणधारकांनी स्वत: अतिक्रमण न काढल्यास टपरी, शेड जप्त करुन खर्च वसूल करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी स्वत: टपरी-शेड काढून घेतल्याने दोंडाईचा रोड, डोंगरगावरोड, मेनरोड, जना मोहिदा रोड, पंचायत समिती चौक, बसस्टॅण्ड परिसर, खेतियारोड चौफुली, पाण्याची टाकी, गॅसगोडाऊन परिसर येथील रस्ते मोकळे झाले होते. जुना प्रकाशा रोड, प्रेस मारुती मैदान, टाऊन हॉल परिसरातील कच्चे व पक्के अतिक्रमण तोडण्यासाठी पालिका पथकाने बुलडोझरचा वापर केला. भाजीमंडईसह शहराच्या विविध भागातील रस्ते यामुळे मोकळे झाले.
मात्र गेल्या दोन दिवसांपासून या रस्त्यांवर पुनश्च लॉरीधारकांसह अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने लावण्यात येत असल्याने ज्या उद्देशाने मोहीम राबविण्यात आली. तो उद्देश फसल्याचे दिसून येत आहे. लॉरीधारकांनी बसस्टॅण्ड परिसर, भाजीमंडई, महात्मा गांधी पुतळा चौक, स्टेट बँक चौक, मेनरोड आदी ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे लॉरी लावून व्यवसाय सुरु केला आहे. अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने जुन्या तहसील कचेरी, डोंगरगाव रोड, बसस्थानक परिसर, टॅक्सी स्टॅण्ड आदी ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून उभी केली जात असल्याने रहदारीस अडथळ्यासह वाहतूक कोंडीची समस्या ‘जैसे थे’ झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Discontent over not encroaching on the rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.