शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

नंदुरबार काँग्रेस कमेटीतर्फे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रिपब्लिक भारत टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रिपब्लिक भारत टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत अर्णब गोस्वामीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. निवेदनात, अर्णब गोस्वामी व बार्कचे अधिकारी दासगुप्ता यांच्यासोबत व्हाॅट्स अप चॅट करत अनेक देशविरोधी बाबींवर चर्चा केल्याचे उघड झाले आहे. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालकोटवर भारताने हल्ला केला या कारवाईची माहिती गोस्वामी यांना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून दिसत आहे. देशाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व गोपनीय माहिती गोस्वामी यांच्याकडे कशी आली, देशाच्या संरक्षणविषयक माहिती बाहेर येणे अत्यंत गंभीर आहे. गोस्वामी व त्याच्या रिपब्लिक टीव्हीने दूरदर्शनची सॅटेलाईट फ्रीक्वेन्सी बेेकायदेशीरपणे वापरुन प्रसार भारतीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान केल्याचे म्हटले आहे. यावेळी माजीमंत्री पद्माकर वळवी, कार्याध्यक्ष दिलीप नाईक, पंडीतराव पवार, शांतीलाल पाटील, नरेश पवार, खंडेराव पवार, देवा चाैधरी, राजेंद्र पाटील, स्वरूप बोरसे, एजाज बागवान, छोटू भिल, शिवदास भिल, भिमराव पाटील आदी उपस्थित होते.