शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

आदिवासी विकास विभागाच्या निधीचे सोशल ऑडिट करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार जिल्हा हा राज्यातील अतिमागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या विकासासाठी दरवर्षी आदिवासी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार जिल्हा हा राज्यातील अतिमागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या विकासासाठी दरवर्षी आदिवासी विकास विभागाकडून 400 कोटीहून अधिक निधी वितरित करण्यात येतो. मात्र ऐवढा निधी खर्च करुनदेखील जिल्ह्यातील मागासलेपण जैसे थे आहे. त्यामुळे या निधीचे सोशल ऑडिट करण्याची मागणी होत आहे.या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देवून आदिवासी विकास विभागाच्या निधी वाटपाचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी विविध आदिवासी संघटनेच्या पदाधिका:यांनी केली. याबाबत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासींच्या विकासासाठी जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर निधी येतो. या निधीचा योग्य प्रकारे विनियोग केल्यास जिल्ह्यात सकारात्मक बदल पहावयास मिळेल. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था एका नव्या उंचीवर पोहोचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांकदेखील वाढेल. परंतु या सर्व बाबी कागदांवरच आहे. आरोग्य सेवा, दळण वळण, आदिवासी जीवनमान यात काहीच विकास झाला नाही. त्यामुळे एका महिन्याच्या आत आपण आपल्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या निधीचे ऑडिट करावे. या समितीत आदिवासी समाजाच्या एका प्रतिनिधीला घ्यावे अन्यथा सर्व आदिवासी संघटनांतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दीग्विजयसिंह राजपूत, अनिल वळवी, अंकुश नाईक, अमर वळवी, अक्षय कोकणी, पंकज गांगुर्डे, प्रमोद पवार आदींनी केली दिला आहे.