सोलर पंप योजनेला गती देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST2021-02-05T08:09:00+5:302021-02-05T08:09:00+5:30
शाळा सुरू होणार असल्याने उत्साह बोरद : २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील विविध भागात पाचवीनंतरचे वर्ग सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ...

सोलर पंप योजनेला गती देण्याची मागणी
शाळा सुरू होणार असल्याने उत्साह
बोरद : २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील विविध भागात पाचवीनंतरचे वर्ग सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात उत्साह आहे. तळोदा तालुक्यातील विविध गावांमध्ये शाळा सुरू करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
चिंचपाडा येथे विविध स्पर्धा
चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील वनवासी विद्यालय व चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा झाला. या निमित्त निबंधलेखन, कथाकथन, काव्यवाचन आणि ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य बी.एम. निकुंभ होते. प्रसंगी ग्रंथपाल सुभाष वळवी, ए.के. लोहार, प्रा.आर.डी. सोनवणे, एस.आर. परदेशी, एन.एन. भागवत, पी.जी. देसले, संभाजी गावीत उपस्थित होते. पूनम पाडवी, रिना निकम, कुसुम वसावे, अंकुश वळवी, गायत्री वसावे, किशोरी पाडवी, काजल मोरे, सृष्टी जैन या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.
समस्या कायम
नंदुरबार : शहरालगतच्या वाघोदा शिवारात रस्ते नसल्याने नागरिकांचे हाल कायम आहेत. याबाबत नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा करूनही कारवाई करण्यात आलेली नाही. लक्ष देण्याची मागणी आहे.
गटारी स्वच्छ करा
नंदुरबार : शहरालगतच्या होळतर्फे हवेली शिवारात गटारी स्वच्छ करण्याची मागणी आहे. गुरुकुल नगर एक आणि दोन याठिकाणी गटारी तुंबल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
एकलव्य विद्यालयात मतदान दिन उपक्रम
नंदुरबार : एकलव्य विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा झाला. विद्यार्थ्यांना मतदारांची कर्तव्ये, मतदानाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यालयाचे शिक्षक संतोष पाटील यांनी राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ दिली. ज्येष्ठ शिक्षक अशोक पाटील, हारून कागझी, अश्फाक मन्सुरी, वसंत वसईकर, सुनील पाटील, धोंडीराम शिनगर, दीपक माळी, शैलजा कापडिया, जयश्री खैरनार, किरण रघुवंशी, मोनाली त्रिकाळ उपस्थित होते.
मजुरांना रोजगार
नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात कापूस वेचणी तसेच विविध शेतीकामे संपली आहेत. यातून मजुरांचा ओढा आता मिरची तोडणीसाठी असल्याने कामांना गती आली आहे. यातून तालुक्यातील मिरची उत्पादकांच्या शेतातील कामांना गती आल्याची माहिती देण्यात आली आहे.
दुर्गम भागात गारठा
धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागातही थंडीचे पुनरागमन झाले आहे. यातून गावपाड्यांवरचे पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या आहेत. तालुक्यातील विविध भागात गारठ्यामुळे जनजीवनावरही परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. येत्या मार्चपर्यंत थंडी टिकून राहील, असा अंदाज आहे.
रजाळे येथे उपसरपंच निवड
नंदुरबार : तालुक्यातील रजाळे येथे उपसरपंचपदी शिवसेनेचे मनोज चिंधू पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच रेखाबाई पाटील यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सभेत मनोज पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. प्रसंगी सदस्य भाऊराव मराठे, गुलाब भिल, सोनाली पाटील, भटू मराठे, इंदूबाई वाघ, अलका भिल, ग्रामसेवक चंद्रसिंग ठाकरे उपस्थित होते. शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, कृउबाचे माजी सभापती किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनात ही निवड करण्यात आली.
सुटीमुळे होणार गर्दी
ब्राह्मणपुरी : २६ जानेवारी रोजी सुटी असल्याने राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे गर्दी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यासह जवळील जिल्ह्यातील नागरिक येथे एकदिवसीय सहलींसाठी येण्याची शक्यता असून, यातून पर्यटन उद्योगाला लाभ होणार आहे.