्रसातबा:यावर कर्जाचा बोजा अन् मनात नैराश्याच्या ओङयातूनच संपवलं जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:49 IST2019-11-05T12:49:20+5:302019-11-05T12:49:26+5:30
जितेंद्र गिरासे । लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : विनाअनुदानित संस्थेत काम करुनही भागेना, म्हणून मग गावात असलेली वडीलोपाजिर्त शेती ...

्रसातबा:यावर कर्जाचा बोजा अन् मनात नैराश्याच्या ओङयातूनच संपवलं जीवन
जितेंद्र गिरासे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : विनाअनुदानित संस्थेत काम करुनही भागेना, म्हणून मग गावात असलेली वडीलोपाजिर्त शेती सुरु केली़ यातही अपयशालाच हात लागला़ यश येईल म्हणून उभारी धरली़ यंदा पाऊस आला पीक तरारलं परंतू अवकाळीने वाहून गेलं़ यातून सातबा:यावर कर्जाचा आणि मनात नैराश्याचं ओझं बळावत गेल्याने अखेर शेतक:याने स्वत:ला संपवल्याची ह्रदयद्रावक घटना कोठली त़सा़ ता़ शहादा घडली़
प्रफुल्ल राजधर पाटील असे शेतक:याचे नाव असून त्याच्या आत्महत्येने शेतक:यांची मनस्थिती पुन्हा समोर आली आह़े कोठली त़सा ता़ शहादा येथील प्रफुल्ल पाटील यांनी रविवारी सायंकाळी आत्महत्या केल्यानंतर ओला दुष्काळ अधोरेखित झाला आह़े वडीलोपाजिर्त 12 एकर शेतीची मालकी असलेल्या प्रफुल्ल यांचे शिक्षण डीएर्डपयत झाले होत़े विनाअनुदानित शाळेत काही काळ ज्ञानदानाचे कार्य केल्यानंतर त्याठिकाणी वेतन मिळत नसल्याने अखेर शेतीचा मार्ग पत्करला होता़ शहादा तालुका हा तसा प्रगतीशील शेतक:यांचा परिसर असल्याने आपलाही टिकाव लागेल हीच खात्री मनाशी होती़ यातून वेळावेळी शेती करताना ज्येष्ठांचा सल्ला घेत शेतीला सुरुवात केली़
प्रारंभी जे पिकलं, ते मिळेल त्या भावात विकून ‘अॅडजस्ट’ करण्याचा प्रयत्न केला़ परंतू दरवर्षी उत्पादन आणि खर्च यांचा ताळमेळ न बसल्याने मग कर्जाचा डोलारा वाढायला लागला़ सातबा:यावर एकाच राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज वाढून लाखांच्या घरात गेलं़ यातून नैराश्य येऊन विमनस्क अवस्था झाल्याने कुटूंबियांनी समजूतही काढली़ यातून सावरत पुन्हा शेतीला सुरुवात केली़ यंदा स्थिती चांगली असल्याने कर्ज मिटणार अशी आशा असताना अवकाळीने पुन्हा दगा दिल्याने नैराश्य टोकाला गेल़े त्यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर त्यांचे कुटूंबिय पूर्णपणे सुन्न झाले होत़े आई-वडीलांचा आक्रोश, पत्नी, 10 वर्षाची मुलगी आणि 3 वर्षाचा नकळता मुलगा यांची अवस्था पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रु मावत नव्हत़े मयत प्रफुल्ल पाटील यांच्या वारसांची झालेली बिकट अवस्था पुढील काळात तरी संपणार का, असा प्रश्न शेतक:याच्या आत्महत्येनंतर उपस्थित होत आह़े