शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

लक्षणे असलेल्यांचे अहवाल उशीराने येत असल्याने मृत्यूंचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांचा ट्रूनेट व रॅपीड कोरोना चाचणी अहवाल लागलीच मिळत नसल्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांचा ट्रूनेट व रॅपीड कोरोना चाचणी अहवाल लागलीच मिळत नसल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणने आहे. या दोन्ही चाचण्या लागलीच मिळाव्या अशी मागणी होत आहे.जिल्ह्यात दररोज किमान एक ते तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. सद्य स्थितीत मृत्यू संख्या ४० झाली आहे. गेल्या महिनाभरात तब्बल ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. पहिले नंदुरबारात ट्रूनेट किंवा रॅपीड टेस्ट करण्याची सोय नव्हती. गेल्या १५ दिवसांपासून या दोन्ही टेस्ट स्थानिक ठिकाणी केल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे सोय झाली आहे. आरटीपीसीआर टेस्टसाठी मात्र अद्यापही धुळ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तेथील अहवाल येण्यास दोन ते तीन दिवस लागत आहेत. ट्रूनेट व रॅपीडच्या चाचण्या देखील १०० टक्के खात्रीच्या नाहीत. २० ते ३० टक्के रिपोर्टमध्ये बदल येत आहेत. असे असले तरी या चाचण्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेत रुग्णांवर उपचार करणे आवश्यक आहे.कोरोनाबाधीत व जास्त लक्षणे असलेला रुग्ण दाखल होताच त्याची या रॅपीड किंवा ट्रूनेट चाचणी करणे आवश्यक आहे. परंतु किमान एक ते दोन दिवस या दोन्ही चाचण्या अशा रुग्णाच्या केल्या जात नाहीत. तोपर्यंत त्याच्यातील लक्षणे वाढून व वेळीच उपचार न मिळत असल्याने त्याचा मृत्यू होत आहे.गेल्या आठ ते दहा दिवसात असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे तीव्र लक्षणे असलेला रुग्ण आल्यास त्याची लागलीच अशी चाचणी करून पॉझिटिव्ह आल्यास संबधीत उपचार सुरू करण्यात यावे. तसे झाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते.दरम्यान, नंदुरबारात आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्याची तयारी पुर्ण झाली आहे. ती लवकर सुरू झाल्यास रिपोर्ट लवकर मिळतील व लागलीच रुग्णांवर उपचार देखील करता येणार आहे.परंतु ही प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत चालढकलपणा केला जात असल्याचे बोलले जात आहे. ९ आॅगस्टचा मुहूर्त सांगितला जात असला तरी त्या दिवशी देखील सुरू केली जाते किंवा याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.२०० पेक्षा अधीक जणांच्या अहवाल वेटींगवरमंगळवारी एकाच दिवसात ६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. गेल्या चार महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अहवाल आल्याने खळबळ उडाली. शिवाय तीन जणांचा देखील मृत्यू झाला होता. बुधवारी मात्र सायंकाळी उशीरापर्यंत एकही अहवाल प्राप्त झाला नव्हता. शनिमांडळ येथील वृद्धाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची संख्या आता ४० झाली आहे. साधारणत: २०० पेक्षा अधीक अहवालांची प्रतिक्षा लागून आहे.