शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लक्षणे असलेल्यांचे अहवाल उशीराने येत असल्याने मृत्यूंचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांचा ट्रूनेट व रॅपीड कोरोना चाचणी अहवाल लागलीच मिळत नसल्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांचा ट्रूनेट व रॅपीड कोरोना चाचणी अहवाल लागलीच मिळत नसल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणने आहे. या दोन्ही चाचण्या लागलीच मिळाव्या अशी मागणी होत आहे.जिल्ह्यात दररोज किमान एक ते तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. सद्य स्थितीत मृत्यू संख्या ४० झाली आहे. गेल्या महिनाभरात तब्बल ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. पहिले नंदुरबारात ट्रूनेट किंवा रॅपीड टेस्ट करण्याची सोय नव्हती. गेल्या १५ दिवसांपासून या दोन्ही टेस्ट स्थानिक ठिकाणी केल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे सोय झाली आहे. आरटीपीसीआर टेस्टसाठी मात्र अद्यापही धुळ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तेथील अहवाल येण्यास दोन ते तीन दिवस लागत आहेत. ट्रूनेट व रॅपीडच्या चाचण्या देखील १०० टक्के खात्रीच्या नाहीत. २० ते ३० टक्के रिपोर्टमध्ये बदल येत आहेत. असे असले तरी या चाचण्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेत रुग्णांवर उपचार करणे आवश्यक आहे.कोरोनाबाधीत व जास्त लक्षणे असलेला रुग्ण दाखल होताच त्याची या रॅपीड किंवा ट्रूनेट चाचणी करणे आवश्यक आहे. परंतु किमान एक ते दोन दिवस या दोन्ही चाचण्या अशा रुग्णाच्या केल्या जात नाहीत. तोपर्यंत त्याच्यातील लक्षणे वाढून व वेळीच उपचार न मिळत असल्याने त्याचा मृत्यू होत आहे.गेल्या आठ ते दहा दिवसात असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे तीव्र लक्षणे असलेला रुग्ण आल्यास त्याची लागलीच अशी चाचणी करून पॉझिटिव्ह आल्यास संबधीत उपचार सुरू करण्यात यावे. तसे झाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते.दरम्यान, नंदुरबारात आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्याची तयारी पुर्ण झाली आहे. ती लवकर सुरू झाल्यास रिपोर्ट लवकर मिळतील व लागलीच रुग्णांवर उपचार देखील करता येणार आहे.परंतु ही प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत चालढकलपणा केला जात असल्याचे बोलले जात आहे. ९ आॅगस्टचा मुहूर्त सांगितला जात असला तरी त्या दिवशी देखील सुरू केली जाते किंवा याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.२०० पेक्षा अधीक जणांच्या अहवाल वेटींगवरमंगळवारी एकाच दिवसात ६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. गेल्या चार महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अहवाल आल्याने खळबळ उडाली. शिवाय तीन जणांचा देखील मृत्यू झाला होता. बुधवारी मात्र सायंकाळी उशीरापर्यंत एकही अहवाल प्राप्त झाला नव्हता. शनिमांडळ येथील वृद्धाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची संख्या आता ४० झाली आहे. साधारणत: २०० पेक्षा अधीक अहवालांची प्रतिक्षा लागून आहे.