शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

लक्षणे असलेल्यांचे अहवाल उशीराने येत असल्याने मृत्यूंचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांचा ट्रूनेट व रॅपीड कोरोना चाचणी अहवाल लागलीच मिळत नसल्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांचा ट्रूनेट व रॅपीड कोरोना चाचणी अहवाल लागलीच मिळत नसल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणने आहे. या दोन्ही चाचण्या लागलीच मिळाव्या अशी मागणी होत आहे.जिल्ह्यात दररोज किमान एक ते तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. सद्य स्थितीत मृत्यू संख्या ४० झाली आहे. गेल्या महिनाभरात तब्बल ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. पहिले नंदुरबारात ट्रूनेट किंवा रॅपीड टेस्ट करण्याची सोय नव्हती. गेल्या १५ दिवसांपासून या दोन्ही टेस्ट स्थानिक ठिकाणी केल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे सोय झाली आहे. आरटीपीसीआर टेस्टसाठी मात्र अद्यापही धुळ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तेथील अहवाल येण्यास दोन ते तीन दिवस लागत आहेत. ट्रूनेट व रॅपीडच्या चाचण्या देखील १०० टक्के खात्रीच्या नाहीत. २० ते ३० टक्के रिपोर्टमध्ये बदल येत आहेत. असे असले तरी या चाचण्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेत रुग्णांवर उपचार करणे आवश्यक आहे.कोरोनाबाधीत व जास्त लक्षणे असलेला रुग्ण दाखल होताच त्याची या रॅपीड किंवा ट्रूनेट चाचणी करणे आवश्यक आहे. परंतु किमान एक ते दोन दिवस या दोन्ही चाचण्या अशा रुग्णाच्या केल्या जात नाहीत. तोपर्यंत त्याच्यातील लक्षणे वाढून व वेळीच उपचार न मिळत असल्याने त्याचा मृत्यू होत आहे.गेल्या आठ ते दहा दिवसात असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे तीव्र लक्षणे असलेला रुग्ण आल्यास त्याची लागलीच अशी चाचणी करून पॉझिटिव्ह आल्यास संबधीत उपचार सुरू करण्यात यावे. तसे झाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते.दरम्यान, नंदुरबारात आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्याची तयारी पुर्ण झाली आहे. ती लवकर सुरू झाल्यास रिपोर्ट लवकर मिळतील व लागलीच रुग्णांवर उपचार देखील करता येणार आहे.परंतु ही प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत चालढकलपणा केला जात असल्याचे बोलले जात आहे. ९ आॅगस्टचा मुहूर्त सांगितला जात असला तरी त्या दिवशी देखील सुरू केली जाते किंवा याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.२०० पेक्षा अधीक जणांच्या अहवाल वेटींगवरमंगळवारी एकाच दिवसात ६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. गेल्या चार महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अहवाल आल्याने खळबळ उडाली. शिवाय तीन जणांचा देखील मृत्यू झाला होता. बुधवारी मात्र सायंकाळी उशीरापर्यंत एकही अहवाल प्राप्त झाला नव्हता. शनिमांडळ येथील वृद्धाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची संख्या आता ४० झाली आहे. साधारणत: २०० पेक्षा अधीक अहवालांची प्रतिक्षा लागून आहे.