लोकप्रतिनिधींकडून नुकसानीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:49 IST2020-06-14T12:49:15+5:302020-06-14T12:49:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार वादळासह पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले ...

लोकप्रतिनिधींकडून नुकसानीची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार वादळासह पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुमारे पाऊण तास चाललेल्या या पावसाने शेतपिकांचे व घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचेखांब उन्मळून पडल्याने वीज तारा तुटल्या व वीजपुरवठा खंडित झाला आहे. सोनवलतर्फे बोरद व डोंगरगाव आदी भागात शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शनिवारी नुकसानग्रस्त भागाला पालकमंत्री अॅड.के.सी. पाडवी, खासदार डॉ.हीना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, गटविकास अधिकारी सी.टी. गोस्वामी, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, तलाठी, मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी लोकप्रतिनिधींनी पाहणी करून संबंधित विभागांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
४तळोदा तालुक्यात नुकसान झालेल्या घरांची व शेतपिकांची पाहणी शनिवारी पालकमंत्री अॅड.के.सी. पाडवी, आमदार राजेश पाडवी, प्रांताधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, निवासी नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, विस्तार अधिकारी संजय पाटील, मंडळ अधिकारी एम.ए. साळवे, कृषी सहायक चंद्रप्रकाश पवार, बोरसे, देशमुख, मोडचे सरपंच जयसिंग माळी, मंडळ अधिकारी माया मराठे, ग्रामविकास अधिकारी शांतीलाल बावा, तलाठी अरुण धनगर आदींनी नुकसानीची पाहणी केली. घरांसह शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावेत, अशी सूचना लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना दिली.
वादळामुळे सोनवलतर्फे बोरद, परिवर्धा या परिसरात शेतीचे व अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे ३५० विजेचे खांब कोसळल्याची माहिती आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून अजून पंचनामा पूर्ण झाला नसल्याने नेमका अंदाज वर्तवता येणार नाही. येत्या दोन दिवसात महसूल व कृषी विभागाकडून आलेल्या नुकसानीच्या पंचनामा अहवालानंतरच अधिकृत नुकसानीचा अंदाज येईल. नुकसान झालेल्या शेतकरी व पडझड झालेल्या घरांच्या नुकसानग्रस्तांच्या पाठीशी शासन पूर्णपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकरी व घर मालकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याची माहिती पालकमंत्री अॅड.के.सी. पाडवी यांनी दिली.
पाहणीदरम्यान संबंधित विभागाच्या अधिकाºयांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना खासदार व आमदारांनी दिल्या. नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून यादी ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर लावण्याची सूचना करुन नुकसानग्रस्तांना तातडीने मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच घरे कोसळून जखमी झालेल्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्याच्या सूचना दिल्या. वादळामुळे विजेचे खांब वाकून तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. खंडित वीजपुरवठा दोन दिवसात सुरू करण्याची हमी वीज कंपनीच्या अधिकाºयांनी दिली. वादळामुळे घरांची पडझड होऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करुन प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दोन दिवसात घराचे व कृषी विभागाने शेतीचे पंचनामे करून शेतकºयांच्या नुकसानीबाबत अहवाल तातडीने द्यावा. पंचनामे करीत असताना एकही शेतकरी अथवा नुकसानग्रस्त व्यक्तीचे नाव सुटणार नाही याची दक्षता संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी घेण्याची सूचना खासदार डॉ.हीना गावीत आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी दिली.