शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

आंबा व चारोळीसह घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 13:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यातील राणीपूर परिसरासह साबलापाणी, नंबरपाडा व नागझिरी परिसरात मान्सूनपूर्व जोरदार वादळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यातील राणीपूर परिसरासह साबलापाणी, नंबरपाडा व नागझिरी परिसरात मान्सूनपूर्व जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे घरांसह आंबा व चारोळीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी संबंधित गावांना भेटी देत कृषी विभागासह मंडळ अधिकारी व तलाठी यांना पंचनामा करण्याचे तातडीने आदेश देण्यात आले आहेत.
शहादा व धडगाव तालुक्यात गेल्या १५ दिवसात दोन ते तीन ठिकाणी पाऊस झाला. रविवारी सायंकाळी वादळी वारे सुरू झाले. त्यानंतर काही वेळातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने साबलापाणी, नंबरपाडा व नागझरी परिसराला अक्षरश: झोडपून काढले. एक तासापेक्षा जास्तवेळ पाऊस झाल्याने नदी-नाल्यांमधून पाणी वाहत होते. यात नबरपाडा येथील जामसिंग सुलतान पावरा यांच्या दोन घराचे नुकसान झाले. साबलापाणी येथील अनेक घरांची छपरे उडाली. घरांमध्ये साठवलेला गुरांचा चारा पूर्णत: ओला झाल्याने चाºयाचे नुकसान झाले. दोन मोटारसायकलींचेही नुकसान झाले आहे.
या वादळी पावसामुळे परिसरातील सुमारे २०० आंब्याच्या झाडांचे नुकसान झाले असून कैºया जमिनीवर पडून खराब झाल्या. साठवलेल्या चारोळीचेही नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे आदिवासी बांधवांना आपल्या वस्तू व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी वेळ मिळाला नाही. मिरसिंग शंकर पावरा यांनी दहा-बारा वर्षापूर्वी हापूस व राजापुरी आंब्याची रोपे रत्नागिरीहून आणली होती. मेहनत करून झाडांना वाढवले होते. मात्र या झाडांवरील कैºया तुटून पडल्या तर काही झाडे मुळासकट जमिनीवर कोलमडून पडले. प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांनी मंडळ अधिकारी, तलाठी व कृषी अधिकारी यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.


शहादा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी व राणीपूर भागात रविवारी मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी आमदार राजेश पाडवी यांनी केली असून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई अदा करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. या पावसामुळे व गारपिटीमुळे अनेकांचे नुकसान झाले असून सोसाट्याच्या वाºयामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्त गावातील राणीपूर, नागझिरी, नंबरपाडा, साबलापाणी, आदाºयापाडा येथे नुकसानीची पाहणी आमदार पाडवी. या वेळी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, वीरसिंग पाडवी, विठ्ठलराव बागले, सुकलाल रावताळे, सचिन पावरा, कमल पावरा, हितेश मेडेकर, रामदास पावरा व कार्यकर्ते उपस्थित होते.


रत्नागिरी येथील कृषी विद्यापीठातून हापूस व राजापुरी या आंब्यांचे दहा ते बारा वर्षापूर्वी रोपे आणली होती. परिसरातील लोकांना चांगल्या दर्जाचे व स्वस्त आंबे देण्याची इच्छा होती. मात्र मान्सूनपूर्व पावसाने झाडे व आंबा फळाचे नुकसान केल्याने या फळांची चव आता लोकांना मिळणार नाही.
-मेलसिंग शंकर पावरा, शेतकरी, साबलापाणी.