चक्रीवादळाच्या तडाख्याचा नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST2021-05-20T04:32:43+5:302021-05-20T04:32:43+5:30

अचानक आलेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.या पावसाच्या तडाख्याचा सर्वाधिक फटका केळी आंबा बागायती शेती उत्पादक शेतकऱ्यांना बसला. दरम्यान ...

Damage to farmers in Navapur taluka due to cyclone | चक्रीवादळाच्या तडाख्याचा नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान

चक्रीवादळाच्या तडाख्याचा नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान

अचानक आलेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.या पावसाच्या तडाख्याचा सर्वाधिक फटका केळी आंबा बागायती शेती उत्पादक शेतकऱ्यांना बसला. दरम्यान या अवकाळी पावसामुळे गरमीमुळे हैराण असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवापूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्याच्या समुद्र किनारा पट्टीत सुरू असलेल्या तौत्के' चक्रीवादळच्या तडाखात महाराष्ट्रासह गुजरात राज्याला सुद्धा मोठा तडाखा बसला आहे त्यामुळे प्रचंड नुकसान या चक्रीवादळामुळे किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यामध्ये नवापूर तालुकाला सुद्धा झालेला आहे.वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस पडल्याने तालुक्यात केळी पिकांचे मोठ्या प्रमाणे नुकसान झालेले आहे त्याच प्रमाणे मुग, भुईमूग शेंगा. इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे म्हणून नवापूर तालुक्यात झालेल्या पिकांचे व केळी बागांचे शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अखिल महाराष्ट्र विद्यार्थी संघटनांच्या जिल्हाध्यक्ष .आर.सी.गावीत व शबरी माता आदिवासी विकास संस्था महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष. दीपक फुलसिंग पाडवी .व शेतकरी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

Web Title: Damage to farmers in Navapur taluka due to cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.